शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

India-China Border Dispute: अरुणाचल प्रदेशवर ड्रॅगनची वाकडी नजर; चीनची जोरदार तयारी, भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 07:36 IST

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन अरुणाचल प्रदेशच्या सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर दावा करतोय.

नवी दिल्ली - भारताचंचीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरून वादंग आहेत. ज्यामुळे या सीमेवर नेहमीच तणाव असतो. जम्मू-काश्मीरवरून पाकिस्तानशी वाद आहे, तर केवळ लडाखमध्ये नव्हे, तर अरुणाचल प्रदेशातही चीनसोबत सीमावाद आहे. चीनने भारताच्या हजारो किलोमीटर परिसरावर दावा केला आहे, पूर्व लडाखमध्ये मे २०२० पासून चीनसोबत तणाव आहे, परंतु आता अरुणाचलच्या सीमेवरही ड्रॅगन आपल्या बाजूने भक्कम बांधकाम करत आहे(India China FaceOff)

वृत्तसंस्थेनुसार, भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी सांगितले की, अरुणाचलच्या सीमेवर चीन वेगाने पायाभूत सुविधा विकसित करत आहे. चीनने सीमेपलीकडे रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्क वाढवला आहे. गावे उभारली आहेत. ज्याचा वापर दुहेरी कारणांसाठी केला जाऊ शकतो. शिवाय, तेथे 5G मोबाइल नेटवर्कही तयार करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशवरून चीनसोबत दीर्घकाळ सीमावाद सुरू आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन अरुणाचल प्रदेशच्या सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर दावा करतो. तर अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असूनही चीन आपल्या कारवाया मागे घेत नाही.

चीनसोबतचा सीमावाद काय आहे?

चीनसोबतचा सीमावाद समजून घेण्यापूर्वी थोडा भूगोल समजून घेणे आवश्यक आहे. भारताची चीनशी ३४८८ किमी लांबीची सीमा आहे. ही सीमा पूर्व, मध्य आणि पश्चिम अशा तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे. पूर्व सेक्टरमध्ये सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश चीनच्या सीमेवर आहेत, ज्याची लांबी १३४६ किमी आहे. हिमाचल आणि उत्तराखंडची सीमा मध्यभागी आहे, ज्याची लांबी ५४५ किमी आहे. त्याच वेळी, लडाख पश्चिम सेक्टरमध्ये येतो, जिथं चीनची १५९७ किमी लांबीची सीमा आहे.

अरुणाचल प्रदेशच्या ९० हजार चौरस किमी क्षेत्रफळावर चीनचा दावा आहे. तर लडाखचा सुमारे ३८ हजार चौरस किमी चीनच्या ताब्यात आहे. याशिवाय २ मार्च १९६३ रोजी झालेल्या करारात पाकिस्तानने ५१८० चौरस किलोमीटर पीओके जमीन चीनला दिली होती. १९५६-५७ मध्ये चीनने शिनजियांग ते तिबेट असा महामार्ग बांधला. त्यांनी या महामार्गाचा रस्ता अक्साई चिनमधून पार केला. त्यावेळी अक्साई चीन भारताजवळ होते. रस्ता बांधल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनचे राष्ट्रपती झाऊ इन लाई यांना पत्र लिहिले. प्रत्युत्तर देताना झोऊ यांनी सीमा विवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि दावा केला की भारताच्या ताब्यातील १३ हजार चौरस किमी क्षेत्रफळ आहे. १९१४ मध्ये सेट केलेल्या मॅकमोहन लाइनवर त्यांचा देश विश्वास ठेवत नाही.

मॅकमोहन लाइन काय आहे?

१९१४ मध्ये शिमला येथे एक परिषद झाली. यामध्ये ब्रिटन, चीन आणि तिबेट असे तीन देश होते. या परिषदेत सीमेशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी ब्रिटिश भारताचे परराष्ट्र सचिव हेन्री मॅकमोहन होते. त्यांनी ब्रिटिश भारत आणि तिबेटमधील ८९० किमी लांबीची सीमा रेखाटली. याला मॅकमोहन लाइन म्हणतात. या ओळीत अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे सांगण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर भारताने मॅकमोहन लाइन स्वीकारली, पण चीनने ती स्वीकारण्यास नकार दिला. अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग आहे आणि तिबेटच्या ताब्यात असल्याने अरुणाचलही त्याचाच आहे, असा दावा चीनने केला आहे.

चीन ही रेषा का स्वीकारत नाही?

चीनला मॅकमोहन लाइन मान्य नाही. १९१४ मध्ये जेव्हा ब्रिटिश भारत आणि तिबेट यांच्यात करार झाला तेव्हा ते तिथे उपस्थित नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. तिबेट हा चीनचा भाग आहे, त्यामुळे तो स्वत: कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असा दावा चीन करतं. परंतु १९१४ मध्ये जेव्हा करार झाला तेव्हा तिबेट हा स्वतंत्र देश होता. १९५० मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन