शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

India-China Border Dispute: अरुणाचल प्रदेशवर ड्रॅगनची वाकडी नजर; चीनची जोरदार तयारी, भारत सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 07:36 IST

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन अरुणाचल प्रदेशच्या सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर दावा करतोय.

नवी दिल्ली - भारताचंचीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरून वादंग आहेत. ज्यामुळे या सीमेवर नेहमीच तणाव असतो. जम्मू-काश्मीरवरून पाकिस्तानशी वाद आहे, तर केवळ लडाखमध्ये नव्हे, तर अरुणाचल प्रदेशातही चीनसोबत सीमावाद आहे. चीनने भारताच्या हजारो किलोमीटर परिसरावर दावा केला आहे, पूर्व लडाखमध्ये मे २०२० पासून चीनसोबत तणाव आहे, परंतु आता अरुणाचलच्या सीमेवरही ड्रॅगन आपल्या बाजूने भक्कम बांधकाम करत आहे(India China FaceOff)

वृत्तसंस्थेनुसार, भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल आरपी कलिता यांनी सांगितले की, अरुणाचलच्या सीमेवर चीन वेगाने पायाभूत सुविधा विकसित करत आहे. चीनने सीमेपलीकडे रेल्वे, रस्ते आणि हवाई संपर्क वाढवला आहे. गावे उभारली आहेत. ज्याचा वापर दुहेरी कारणांसाठी केला जाऊ शकतो. शिवाय, तेथे 5G मोबाइल नेटवर्कही तयार करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशवरून चीनसोबत दीर्घकाळ सीमावाद सुरू आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चीन अरुणाचल प्रदेशच्या सुमारे ९० हजार चौरस किलोमीटर क्षेत्रावर दावा करतो. तर अरुणाचल हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील, असे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असूनही चीन आपल्या कारवाया मागे घेत नाही.

चीनसोबतचा सीमावाद काय आहे?

चीनसोबतचा सीमावाद समजून घेण्यापूर्वी थोडा भूगोल समजून घेणे आवश्यक आहे. भारताची चीनशी ३४८८ किमी लांबीची सीमा आहे. ही सीमा पूर्व, मध्य आणि पश्चिम अशा तीन विभागांमध्ये विभागली गेली आहे. पूर्व सेक्टरमध्ये सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश चीनच्या सीमेवर आहेत, ज्याची लांबी १३४६ किमी आहे. हिमाचल आणि उत्तराखंडची सीमा मध्यभागी आहे, ज्याची लांबी ५४५ किमी आहे. त्याच वेळी, लडाख पश्चिम सेक्टरमध्ये येतो, जिथं चीनची १५९७ किमी लांबीची सीमा आहे.

अरुणाचल प्रदेशच्या ९० हजार चौरस किमी क्षेत्रफळावर चीनचा दावा आहे. तर लडाखचा सुमारे ३८ हजार चौरस किमी चीनच्या ताब्यात आहे. याशिवाय २ मार्च १९६३ रोजी झालेल्या करारात पाकिस्तानने ५१८० चौरस किलोमीटर पीओके जमीन चीनला दिली होती. १९५६-५७ मध्ये चीनने शिनजियांग ते तिबेट असा महामार्ग बांधला. त्यांनी या महामार्गाचा रस्ता अक्साई चिनमधून पार केला. त्यावेळी अक्साई चीन भारताजवळ होते. रस्ता बांधल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चीनचे राष्ट्रपती झाऊ इन लाई यांना पत्र लिहिले. प्रत्युत्तर देताना झोऊ यांनी सीमा विवादाचा मुद्दा उपस्थित केला आणि दावा केला की भारताच्या ताब्यातील १३ हजार चौरस किमी क्षेत्रफळ आहे. १९१४ मध्ये सेट केलेल्या मॅकमोहन लाइनवर त्यांचा देश विश्वास ठेवत नाही.

मॅकमोहन लाइन काय आहे?

१९१४ मध्ये शिमला येथे एक परिषद झाली. यामध्ये ब्रिटन, चीन आणि तिबेट असे तीन देश होते. या परिषदेत सीमेशी संबंधित काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यावेळी ब्रिटिश भारताचे परराष्ट्र सचिव हेन्री मॅकमोहन होते. त्यांनी ब्रिटिश भारत आणि तिबेटमधील ८९० किमी लांबीची सीमा रेखाटली. याला मॅकमोहन लाइन म्हणतात. या ओळीत अरुणाचल प्रदेश हा भारताचा भाग असल्याचे सांगण्यात आले.

स्वातंत्र्यानंतर भारताने मॅकमोहन लाइन स्वीकारली, पण चीनने ती स्वीकारण्यास नकार दिला. अरुणाचल हा दक्षिण तिबेटचा भाग आहे आणि तिबेटच्या ताब्यात असल्याने अरुणाचलही त्याचाच आहे, असा दावा चीनने केला आहे.

चीन ही रेषा का स्वीकारत नाही?

चीनला मॅकमोहन लाइन मान्य नाही. १९१४ मध्ये जेव्हा ब्रिटिश भारत आणि तिबेट यांच्यात करार झाला तेव्हा ते तिथे उपस्थित नव्हते, असे त्यांचे म्हणणे आहे. तिबेट हा चीनचा भाग आहे, त्यामुळे तो स्वत: कोणताही निर्णय घेऊ शकत नाही असा दावा चीन करतं. परंतु १९१४ मध्ये जेव्हा करार झाला तेव्हा तिबेट हा स्वतंत्र देश होता. १९५० मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला.

टॅग्स :Indiaभारतchinaचीन