शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
2
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
3
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
4
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
5
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
6
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
7
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
8
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
9
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
10
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
11
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

सैन्यमाघार लवकर पूर्ण करण्यास भारत-चीन राजी, वरिष्ठ पातळीवरील शिष्टाईत झाली सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:15 IST

र्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्यमाघारीस लगेच सुरुवात करून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यानुसार वादाच्या ठिकाणांहून माघारीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : सीमेवरून दोन्ही देशांमध्ये असलेले मतभेद वादामध्ये परिवर्तित होऊ न देण्यावर भारत व चीन यांच्यात सहमती झाली असून सीमेवर शांतता व सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्यमाघारीस लगेच सुरुवात करून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यानुसार वादाच्या ठिकाणांहून माघारीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे.गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन आठवड्यांपूर्वी २० भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांच्या सीमेवर झालेल्या बैठकीत सैन्यमाघारीवर सहमती झाली होती. तरी चीन प्रत्यक्ष माघार न घेता उलट गलवान खोरे व पॅनगाँग सरोवराच्या परिसरात अधिक घट्ट पाय रोवण्याची तयारी करत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर भारताचे सीमेसंबंधीचे विशेष प्रतिनिधी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात टेलिफोनवरून सुमारे दोन तास मनमोकळी व सर्वंकष चर्चा झाली.भारतानेही ठोस पावले उचलावीत - चीनतिकडे बीजिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन म्हणाले की, सीमेवरील आमच्या सैन्याने गलवान खोºयातून माघार घेण्यास सुरुवात केली असून त्यांची ठरल्याप्राणे प्रगती सुरु आहे. भारतही तशीच ठोस कृतीकरून सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी पावले टाकेल, अशी आशा आहे. दोघांचीही माघार सुरुलष्करी कमांडरांच्या बैठकीत प्रत्यक्ष माघारीची सुरुवात ५ जुलैपासून करण्याचे ठरले होते. त्यानुसार चीनकडून कृती होत असल्याचे दिसल्यावर दोन्ही बाजूंनी संघर्षाचे कारण ठरलेल्या गलवान खोºयातील ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट १४’ (पीपी १४) या ठिकाणाहून आस्तेकदम माघारा सुरु केली, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. दोन्ही बाजूंकडून अशीच सैन्यमाघार ‘पीपी १५’ व ‘पीपी १७’ या दोन्ही ठिकाणीही सुरु करण्यात आली आहे. गलवान व गोगरा हॉटस्प्रिंग येथून सैनिकांना घेऊन चिनी सैन्याची वाहने त्यांच्या बाजूच्या आणखी मागील भागात रवाना झालेली रविवारी दिसली होती. चीनने गलवान परिसरात व पॅनगाँग सरोवराकाठी ठोकलेले तंबूही काढले आहेत.मतभेदांवरून वाद होऊ नयेपरराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी व्दिपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सीमेवरून मतभेद असले तरी ते वादात परिवर्तित न होऊ देण्याचे ठरविले होते. आधी ठरल्याप्रमाणे दोघांनी पूर्णपणे सैन्यमाघार लवकर पूर्ण करण्याचे मान्य केले. ही प्र्रक्रिया टप्प्याटप्प्याने व परस्परांच्या पडताळणीने करण्याचेही ठरले. सीमेवर शांततेला तडा जाईल अशी कोणताही घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा पूर्ण आदर करून ती बदलण्याची कोणतीही एकतर्फी कृती न करण्याची हमीही एकमेकांना दिली.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखInternationalआंतरराष्ट्रीय