शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सैन्यमाघार लवकर पूर्ण करण्यास भारत-चीन राजी, वरिष्ठ पातळीवरील शिष्टाईत झाली सहमती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 07:15 IST

र्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्यमाघारीस लगेच सुरुवात करून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यानुसार वादाच्या ठिकाणांहून माघारीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : सीमेवरून दोन्ही देशांमध्ये असलेले मतभेद वादामध्ये परिवर्तित होऊ न देण्यावर भारत व चीन यांच्यात सहमती झाली असून सीमेवर शांतता व सलोखा पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चर्चेमध्ये ठरल्याप्रमाणे सैन्यमाघारीस लगेच सुरुवात करून ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे ठरविले आहे. यानुसार वादाच्या ठिकाणांहून माघारीस प्रत्यक्ष सुरुवात झाल्याचेही दोन्ही देशांनी म्हटले आहे.गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दोन आठवड्यांपूर्वी २० भारतीय सैनिक शहीद झाल्यानंतर दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी कमांडरांच्या सीमेवर झालेल्या बैठकीत सैन्यमाघारीवर सहमती झाली होती. तरी चीन प्रत्यक्ष माघार न घेता उलट गलवान खोरे व पॅनगाँग सरोवराच्या परिसरात अधिक घट्ट पाय रोवण्याची तयारी करत असल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर भारताचे सीमेसंबंधीचे विशेष प्रतिनिधी व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्यात टेलिफोनवरून सुमारे दोन तास मनमोकळी व सर्वंकष चर्चा झाली.भारतानेही ठोस पावले उचलावीत - चीनतिकडे बीजिंगमध्ये चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिआन म्हणाले की, सीमेवरील आमच्या सैन्याने गलवान खोºयातून माघार घेण्यास सुरुवात केली असून त्यांची ठरल्याप्राणे प्रगती सुरु आहे. भारतही तशीच ठोस कृतीकरून सीमेवरील तणाव संपुष्टात आणण्यासाठी पावले टाकेल, अशी आशा आहे. दोघांचीही माघार सुरुलष्करी कमांडरांच्या बैठकीत प्रत्यक्ष माघारीची सुरुवात ५ जुलैपासून करण्याचे ठरले होते. त्यानुसार चीनकडून कृती होत असल्याचे दिसल्यावर दोन्ही बाजूंनी संघर्षाचे कारण ठरलेल्या गलवान खोºयातील ‘पॅट्रोलिंग पॉर्इंट १४’ (पीपी १४) या ठिकाणाहून आस्तेकदम माघारा सुरु केली, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. दोन्ही बाजूंकडून अशीच सैन्यमाघार ‘पीपी १५’ व ‘पीपी १७’ या दोन्ही ठिकाणीही सुरु करण्यात आली आहे. गलवान व गोगरा हॉटस्प्रिंग येथून सैनिकांना घेऊन चिनी सैन्याची वाहने त्यांच्या बाजूच्या आणखी मागील भागात रवाना झालेली रविवारी दिसली होती. चीनने गलवान परिसरात व पॅनगाँग सरोवराकाठी ठोकलेले तंबूही काढले आहेत.मतभेदांवरून वाद होऊ नयेपरराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी व्दिपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी सीमेवरून मतभेद असले तरी ते वादात परिवर्तित न होऊ देण्याचे ठरविले होते. आधी ठरल्याप्रमाणे दोघांनी पूर्णपणे सैन्यमाघार लवकर पूर्ण करण्याचे मान्य केले. ही प्र्रक्रिया टप्प्याटप्प्याने व परस्परांच्या पडताळणीने करण्याचेही ठरले. सीमेवर शांततेला तडा जाईल अशी कोणताही घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा पूर्ण आदर करून ती बदलण्याची कोणतीही एकतर्फी कृती न करण्याची हमीही एकमेकांना दिली.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाखInternationalआंतरराष्ट्रीय