शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, नेमकं काय घडलं पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:33 IST

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली.

१९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या  संकटात सापडली होती. परदेशातून इंधन, खते आणि इतर माल आयात करण्यासाठी भारताच्या तिजोरीत केवळ २ आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन शिल्लक होते. आर्थिक संकट असल्याने परदेशातून कर्जही मिळत नव्हते. देश दिवाळखोरीच्या दिशेने जाण्याची वेळ आली होती. यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला पडला होता होता. अशावेळी तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारून या संकटास यशस्वीरीत्या तोंड दिले.

सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली. आयातीचे बिल अदा करण्यासाठी भारताकडे पुरेसे विदेशी चलन नव्हते. त्यावेळी भारताला कित्येक टन सोने गहाण ठेवावे लागले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावे लागले.

कोणते उपाय केले? 

यावर उपाय म्हणून भारत सरकारने आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली. परमिट राज संपवले. राज्यांची भूमिका निश्चित केली. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी धोरणे स्वीकारण्यात आली. याचे परिणाम समाधानकारक राहिले. २१ व्या शतकाच्या पहिल्या १० वर्षांत भारताची गणना उगवत्या अर्थव्यवस्थांत होऊ लागली. उद्योगांना उभारी मिळाली. रोजगार वाढून गरिबीचा दर कमी झाला.

का निर्माण झाले होते संकट? 

१९५० मध्ये भारताने विकासाचे सोव्हिएट मॉडेल स्वीकारले होते. त्यात औद्योगिक उत्पादनांच्या किमती सरकार ठरवत असे. त्यामुळे बाजाराचे काम नोकरशहा व अर्थतज्ज्ञांच्या हातात गेले. देशात कोणत्या वस्तू उत्पादित करायच्या, किती कच्चा माल आयात करायचा, याचे निर्णयही हाच समूह घेत असे. त्यातच महसूल वाढविण्यासाठी सरकारने कर वाढविले. कर्ज देणे वाढविले. त्यामुळे महागाई गगनाला भिडली. त्यातून अंतिमत: आर्थिक संकट निर्माण झाले.

मनमोहनसिंग : उदारीकरणाचे शिल्पकार

तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी अत्यंत कुशलतेने आर्थिक उदारीकरणाचे धोरण देशात राबविले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी मनमोहनसिंग यांना मजबूत पाठबळ दिले. या दोघांच्या प्रयत्नातून देश आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनManmohan Singhमनमोहन सिंग