शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, नेमकं काय घडलं पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:33 IST

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली.

१९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या  संकटात सापडली होती. परदेशातून इंधन, खते आणि इतर माल आयात करण्यासाठी भारताच्या तिजोरीत केवळ २ आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन शिल्लक होते. आर्थिक संकट असल्याने परदेशातून कर्जही मिळत नव्हते. देश दिवाळखोरीच्या दिशेने जाण्याची वेळ आली होती. यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला पडला होता होता. अशावेळी तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारून या संकटास यशस्वीरीत्या तोंड दिले.

सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली. आयातीचे बिल अदा करण्यासाठी भारताकडे पुरेसे विदेशी चलन नव्हते. त्यावेळी भारताला कित्येक टन सोने गहाण ठेवावे लागले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावे लागले.

कोणते उपाय केले? 

यावर उपाय म्हणून भारत सरकारने आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली. परमिट राज संपवले. राज्यांची भूमिका निश्चित केली. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी धोरणे स्वीकारण्यात आली. याचे परिणाम समाधानकारक राहिले. २१ व्या शतकाच्या पहिल्या १० वर्षांत भारताची गणना उगवत्या अर्थव्यवस्थांत होऊ लागली. उद्योगांना उभारी मिळाली. रोजगार वाढून गरिबीचा दर कमी झाला.

का निर्माण झाले होते संकट? 

१९५० मध्ये भारताने विकासाचे सोव्हिएट मॉडेल स्वीकारले होते. त्यात औद्योगिक उत्पादनांच्या किमती सरकार ठरवत असे. त्यामुळे बाजाराचे काम नोकरशहा व अर्थतज्ज्ञांच्या हातात गेले. देशात कोणत्या वस्तू उत्पादित करायच्या, किती कच्चा माल आयात करायचा, याचे निर्णयही हाच समूह घेत असे. त्यातच महसूल वाढविण्यासाठी सरकारने कर वाढविले. कर्ज देणे वाढविले. त्यामुळे महागाई गगनाला भिडली. त्यातून अंतिमत: आर्थिक संकट निर्माण झाले.

मनमोहनसिंग : उदारीकरणाचे शिल्पकार

तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी अत्यंत कुशलतेने आर्थिक उदारीकरणाचे धोरण देशात राबविले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी मनमोहनसिंग यांना मजबूत पाठबळ दिले. या दोघांच्या प्रयत्नातून देश आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनManmohan Singhमनमोहन सिंग