शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

मोठ्या संकटातून भारत असा पडला बाहेर; सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ, नेमकं काय घडलं पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 06:33 IST

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली.

१९९१ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मोठ्या  संकटात सापडली होती. परदेशातून इंधन, खते आणि इतर माल आयात करण्यासाठी भारताच्या तिजोरीत केवळ २ आठवडे पुरेल इतकेच परकीय चलन शिल्लक होते. आर्थिक संकट असल्याने परदेशातून कर्जही मिळत नव्हते. देश दिवाळखोरीच्या दिशेने जाण्याची वेळ आली होती. यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला पडला होता होता. अशावेळी तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक उदारीकरणाचा मार्ग स्वीकारून या संकटास यशस्वीरीत्या तोंड दिले.

सोने गहाण ठेवण्याची आली होती वेळ

देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे भारताची आयात वाढली होती. त्यामुळे चालू खात्यातील तूट वाढली. आयातीचे बिल अदा करण्यासाठी भारताकडे पुरेसे विदेशी चलन नव्हते. त्यावेळी भारताला कित्येक टन सोने गहाण ठेवावे लागले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावे लागले.

कोणते उपाय केले? 

यावर उपाय म्हणून भारत सरकारने आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया सुरू केली. परमिट राज संपवले. राज्यांची भूमिका निश्चित केली. विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणारी धोरणे स्वीकारण्यात आली. याचे परिणाम समाधानकारक राहिले. २१ व्या शतकाच्या पहिल्या १० वर्षांत भारताची गणना उगवत्या अर्थव्यवस्थांत होऊ लागली. उद्योगांना उभारी मिळाली. रोजगार वाढून गरिबीचा दर कमी झाला.

का निर्माण झाले होते संकट? 

१९५० मध्ये भारताने विकासाचे सोव्हिएट मॉडेल स्वीकारले होते. त्यात औद्योगिक उत्पादनांच्या किमती सरकार ठरवत असे. त्यामुळे बाजाराचे काम नोकरशहा व अर्थतज्ज्ञांच्या हातात गेले. देशात कोणत्या वस्तू उत्पादित करायच्या, किती कच्चा माल आयात करायचा, याचे निर्णयही हाच समूह घेत असे. त्यातच महसूल वाढविण्यासाठी सरकारने कर वाढविले. कर्ज देणे वाढविले. त्यामुळे महागाई गगनाला भिडली. त्यातून अंतिमत: आर्थिक संकट निर्माण झाले.

मनमोहनसिंग : उदारीकरणाचे शिल्पकार

तत्कालीन अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी अत्यंत कुशलतेने आर्थिक उदारीकरणाचे धोरण देशात राबविले. तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी मनमोहनसिंग यांना मजबूत पाठबळ दिले. या दोघांच्या प्रयत्नातून देश आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकला.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनIndiaभारतNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनManmohan Singhमनमोहन सिंग