शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर-पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा अपघात; पुणे अन् मराठवाड्यातील ३० प्रवासी गंभीर जखमी
2
Raja Raghuvanshi : मर्डर मिस्ट्री! "ट्री कटरने हत्या...", राजाच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा; पत्नी बेपत्ता
3
Bengaluru Stampede : "काहींना पास मिळाला, गेट उघडताच..."; चेंगराचेंगरीचं कारण समोर, लोकांनी सांगितलं काय घडलं?
4
'भारतात या, एकत्र सेलिब्रेट करू,' RCB च्या विजयाच्या पोस्टनंतर स्टेट बँकेनं मल्ल्याची उडवली खिल्ली
5
ज्येष्ठ निर्जला एकादशी: एकदाच व्रत करा, २४ एकादशींचे पुण्य मिळवा; पाहा, महात्म्य अन् मान्यता
6
"कुंभमेळ्यात ६० लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा मी..."; बंगळुरुतल्या चेंगराचेंगरीवर CM सिद्धरामय्यांचे वक्तव्य
7
भारतानं चुपचाप टाकले आपले पत्ते, चीनचं वाढणार टेन्शन; टॅरिफवरील ही भविष्यवाणी समजून घ्या
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; १२ देशांच्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाही, ७ देशांवरही कडक निर्बंध
9
राजेंद्र दर्डा यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान
10
ज्येष्ठ निर्जला एकादशी: १ शुभ, १ अशुभ योग; ७ राशींची चंगळ, लक्ष्मी कृपेने धनलाभ, भरभराट काळ!
11
'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र'अंतर्गत यंदा राज्यात १० कोटी वृक्ष लावणार: मुख्यमंत्री
12
मंत्र्यांच्या आयपॅडसाठी १ कोटी ६ लाख; शासनाच्या ई-कॅबिनेट प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी खर्च
13
तब्बल सहा महिने उलटून गेले तरीही राज्यमंत्री अधिकारांविनाच; उरले फक्त पदापुरते
14
पूररेषेच्या आतील अतिक्रमणे रोखा, सर्व्हेक्षणात अचूकतेसाठी उपग्रहाद्वारे मॅपिंग करा- मुख्यमंत्री
15
स्टाफ नर्स घोटाळ्याचे धक्कादायक वास्तव! पैसे घेतात अन् मुंबईत संबंधित कागदपत्रे तपासतात
16
आजचे राशीभविष्य : ०५ जून २०२५; आज क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल, शुभ कार्याची प्रेरणा मिळेल
17
संयम आणि आक्रमकतेचा मिलाफ! भारतीय क्रिकेटचा नवा 'कॅप्टन कूल' म्हणून श्रेयस अय्यरचा उदय
18
विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी
19
जय श्रीराम! इलॉन मस्क यांचे वडील इरॉल मस्क यांनी अयोध्येत घेतले रामललाचे दर्शन
20
१००ची वस्तू १९ हजारांना; बंदी असूनही UAEमार्गे पाकशी जोडलेला व्यापार भरभराटीला

'सर्व जगाला सांगता, पण संसदेला नाही', ऑपरेशन सिंदूरबाबत 16 विरोधी पक्षांचे PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:26 IST

INDIA Bloc Meeting: ऑपरेशन सिंदूरबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे.

INDIA Bloc Meeting: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेश सिंदूरद्वारे पाकस्तानातील अनेक दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. सरकारच्या या कारवाईबाबत देशभरातून कौतुक होत आहे. मात्र, या ऑपरेशनबाबत सरकार पारदर्शक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज (3 जून) दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये I.N.D.I.A आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आली. 

जयराम रमेश, संजय राऊत, राम गोपाल यादव, मनोज झा, डेरेक ओ'ब्रायन हे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पोहोचले होते. या बैठकीनंतर 16 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या पत्रात पहलगाम, पूंछ, उरी, राजौरी येथील दहशतवादी हल्ले आणि भारत-पाक संघर्ष यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर संसदेत मुक्त चर्चेबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

'संसद जनतेला जबाबदार आहे'तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, "16 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. सरकार संसदेला जबाबदार आहे आणि संसद जनतेला जबाबदार आहे. सर्व विरोधकांना वाटते की, केंद्र सरकारने केवळ आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर विधाने करू नयेत, तर संसदेतदेखील संवाद साधावा."

'लष्कराचे आभार माना आणि रणनीतीवर चर्चा करा'काँग्रेसचे खासदार दीपेंदर सिंह हुडा म्हणाले की, "कठीण काळात विरोधी पक्षांनी लष्कर आणि सरकारला पूर्ण पाठिंबा दिला. जेव्हा अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केली, तेव्हा आम्हाला वाटले की, लष्कराचे आभार मानण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे. दहशतवादाविरुद्धच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा करणेही आवश्यक आहे."

'सरकार संसदेला का टाळत आहे?'समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव यांनी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, "तुम्ही संपूर्ण जगाला माहिती देत ​​आहात, पण संसदेला नाही. आम्ही राजनैतिक पातळीवर पूर्णपणे अपयशी ठरलो आहोत. ट्रम्प यांनी युद्धविराम घोषित केला, सरकार यावर गप्प आहे. हा मुद्दा संसदेत चर्चेला पात्र आहे."

'लोकशाहीत संसदेपेक्षा मोठे व्यासपीठ असते का?'शिवसेना (उद्धव गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रश्न विचारले. ते म्हणाले, "जर ट्रम्पसाठी युद्धविराम होऊ शकतो, तर विरोधकांच्या इशाऱ्यावर संसदेचे विशेष अधिवेशन का बोलावले जाऊ नये? यासाठीही आपल्याला ट्रम्पकडे जावे लागेल का? जर सरकार खरोखरच लोकशाहीवर विश्वास ठेवत असेल, तर त्यांनी संसदेत येऊन चर्चा करावी."

या पक्षांनी केली अधिवेशन बोलावण्याची मागणी पत्रावर स्वाक्षरी करणाऱ्या पक्षांमध्ये काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, शिवसेना (उद्धव गट), राजद, नॅशनल कॉन्फरन्स, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, जेएमएम, व्हीसीके, केरळ काँग्रेस, एमडीएमके आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशन यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी