शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

2024 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र होईल, भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 10:47 IST

2024 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र होणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका आमदाराने केला आहे.

बलिया-  2024 पर्यंत भारत हिंदू राष्ट्र होणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशातील भाजपाच्या एका आमदाराने केला आहे. तसंच भारतीय संस्कृती मानणारे मुसलमानच या देशात राहणार असल्याचं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं आहे. उत्तर प्रदेशच्या बलिया जिल्ह्यातील बैरियाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी शनिवारी हे वक्तव्य केलं आहे.

शनिवारी रात्री पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, देशात काही मुस्लिम हे देशभक्त आहेत पण जेव्हा भारत हिंदू राष्ट्र होईल तेव्हा मुस्लिमांना आमच्या संस्कृतीत मिळून मिसळून राहावे लागेल तरच ते देशात राहू शकतील, ज्यांना हे पटत नसेल त्यांनी देशाबाहेर जावे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे अवतार पुरूष आहेत. २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण होत असून २०२४ मध्ये भारत हिंदू राष्ट्र होईल. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचवेळी भारत हा महाशक्ती झालेला असेल त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही वाटा असणार आहे.

पण या विधानावर भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी घुमजाव केलं आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. देशात जे 50 टक्के मुसलमान बंधू आहेत ते हिंदू आहेत, त्यांचं इस्लाम धर्मात परिवर्तन केलं गेलं आहे. ते स्वतःला पुन्हा मुख्यधारेत जोडले जातील. पण जे मुस्लिम भारतात राहून पाकिस्तानचा विचार करतात त्यांना देश सोडून जायला हवं, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांनी इंडियन एक्स्प्रेसची बोलताना दिली आहे. ही माझी व्यक्तिगत विचारसरणी असून याच्याशी पक्षाचा काहीही संबंध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशMLAआमदार