शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

देशात इंडिया आघाडी ३०५ तर राज्यात मविआ एवढ्या जागा जिंकेल, संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 13:20 IST

Lok Sabha Election 2024: ओपिनियन पोलमधून काहीही दावे केले जात असले तरी इंडिया आघाडी देशात ३०५ जागा जिंकेल आणि राज्यात महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, ठाकरे गटाकडून भाजपावर आक्रमकपणे टीका केली जात आहे. त्यात उद्धवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे भाजपाला सातत्याने लक्ष्य करत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध होत असलेल्या ओपिनियन पोलच्या अंदाजावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. ओपिनियन पोलमधून काहीही दावे केले जात असले तरी इंडिया आघाडी देशात ३०५ जागा जिंकेल आणि राज्यात महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा जिंकेल, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आम्ही पक्ष पाहतच नाही महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही पाहत आहोत. आता रामटेकला आमचा उमेदवार नाही, मात्र तिथे आम्ही कामाला लागलो आहोत. त्यासाठी बैठक बोलावली आहे. प्रचारामध्ये हळुहळू रंग चढत जाईल.

ओपिनियन पोलमध्ये जे काही दाखवलं आहे, त्याच्याशी आम्ही सहमत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही १०० टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत. देवेंद्र फडणवीस हे ४५+ वगैरे म्हणताहेत. त्यांना आकडे लावायची सवय आहे, निवडणुकीनंतर त्यांना त्याच धंद्यात पडावं लागेल. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी विजयी होईल. देशभरात आम्ही साधारण ३०५ जागा जिंकू. मोदी चारशे पार म्हणताहेत, पण आम्ही तसं म्हणणार नाही. आमचा अंदाज ३०५ जागा जिंकण्याचा आहे. तर महाराष्ट्रामध्ये आम्ही साधारण ३५+ जागा जिंकू, असा दावा संजय राऊत यांनी केला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री रामटेकमध्ये विद्यमान खासदाराला उमेदवारी देऊ शकले नाहीत. त्यांना उमेदवार बदलावा लागला. आता त्यांनी रोड शो करू द्या नाहीतर आणखी काही करू द्या, विदर्भात त्यांच्या हाती काहीही पडणार नाही.

तसेच रामनवमीच्या मुहूर्तावर राम मंदिरावरूनही संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपाचं रामावरील जे प्रेम आहे ते नकली आणि राजकीय ढोंगाचं प्रेम आहे. कोणत्याही लढ्यामध्ये ते नव्हते. कोणत्याही संघर्षात ते नव्हते. तसेच जे भाजपासोबत गेले आहेत तेही नव्हते. प्रभू राम त्यांच्या मागे उभा राहणार नाही. जे आत्मविश्वासानं मैदानात लढतात, त्यांनाच राम पावतो, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.   

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Sanjay Rautसंजय राऊतINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४