शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
3
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
4
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
5
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
6
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
7
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
8
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
9
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
10
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
11
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
12
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
13
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
14
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
15
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
16
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
17
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
18
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
19
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
20
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?

"आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, तालिबानचं भारताला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:13 IST

India Afghanistan Relations: मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडून भारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडूनभारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. ‘’आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, असं आश्वासन तालिबाननं भारताला दिलं आले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांच्यामध्ये दुबईत झालेल्या भेटीवेळी तालिबानकडून हे आश्वासन देण्यात आले.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे सध्या दुबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांची भेट घेऊन चर्चा केली. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन झाल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान सरकारमधील ही पहिलीच उच्चस्तरीय द्विपक्षीय भेट ठरली आहे. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांसह क्षेत्रिय विकास आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये इराणमधील चाबहार बंदराचा वापक आणि क्रिकेट या मुद्द्यांचाही समावेश होता. तसेच पाकिस्तानमधील अफगाण निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

भारताच्या परराष्ट् मंत्रालयाने सांगितले की, अफगाण सरकारने भारताच्या सुरक्षेबाबतच्या चिंता विचारात घेतल्या. अफगाणिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधी दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळू नये, अशी भारताची इच्छा आहे. त्याबाबत महत्त्वाचं आश्वासन देताना तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरोधातील कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही, असे सांगितले.

या भेटीदरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये असलेल्या ऐतिहासिक मैत्रीवर भर दिला. दोन्ही पक्षांनी भारत सरकारकडून सुरू असलेल्या मानवतावादी मदत कार्यक्रमाचं मूल्यांकन केलं. तसेच अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनी त्यासाठी भारताचं कौतुकही केलं.  

टॅग्स :IndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवादInternationalआंतरराष्ट्रीय