शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, तालिबानचं भारताला आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:13 IST

India Afghanistan Relations: मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडून भारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कमालीचा तणाव निर्माण झालेला आहे. तसेच दोन्हीकडून एकमेकांवर हल्ले होत आहेत. या पार्श्वभूमीवर तालिबानकडूनभारत सरकारला महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं आहे. ‘’आमच्या जमिनीवरून भारतविरोधी कारवाया होणार नाहीत”, असं आश्वासन तालिबाननं भारताला दिलं आले. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री आणि अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांच्यामध्ये दुबईत झालेल्या भेटीवेळी तालिबानकडून हे आश्वासन देण्यात आले.

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हे सध्या दुबईच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मौलवी आमिर मुत्ताकी यांची भेट घेऊन चर्चा केली. २०२१ मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं सरकार स्थापन झाल्यानंतर भारत आणि अफगाणिस्तान सरकारमधील ही पहिलीच उच्चस्तरीय द्विपक्षीय भेट ठरली आहे. या भेटीदरम्यान द्विपक्षीय संबंधांसह क्षेत्रिय विकास आणि इतर मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये इराणमधील चाबहार बंदराचा वापक आणि क्रिकेट या मुद्द्यांचाही समावेश होता. तसेच पाकिस्तानमधील अफगाण निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी मदत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

भारताच्या परराष्ट् मंत्रालयाने सांगितले की, अफगाण सरकारने भारताच्या सुरक्षेबाबतच्या चिंता विचारात घेतल्या. अफगाणिस्तानच्या भूमीवरून भारतविरोधी दहशतवादी कारवायांना खतपाणी मिळू नये, अशी भारताची इच्छा आहे. त्याबाबत महत्त्वाचं आश्वासन देताना तालिबानने अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर भारताविरोधातील कारवायांसाठी होऊ दिला जाणार नाही, असे सांगितले.

या भेटीदरम्यान, भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी भारत आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये असलेल्या ऐतिहासिक मैत्रीवर भर दिला. दोन्ही पक्षांनी भारत सरकारकडून सुरू असलेल्या मानवतावादी मदत कार्यक्रमाचं मूल्यांकन केलं. तसेच अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनी त्यासाठी भारताचं कौतुकही केलं.  

टॅग्स :IndiaभारतAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवादInternationalआंतरराष्ट्रीय