शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

"भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता, ते थांबवण्यासाठीच..."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर परराष्ट्र सचिवांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:24 IST

India Air Strike on Pakistan: भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ६ मे च्या रात्री सशस्त्र दलांनी ही कारवाई केली. या कारवाईत, भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली.

ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेपूर्वी, भारतावर आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या.भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी सांगितले की पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता. जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. जातीय दंगली भडकवण्याचाही प्रयत्न झाला. पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत, असं विक्रम मिस्री म्हणाले.

"जगभरातील दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान अजूनही एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. यामुळे दहशतवाद्यांना शिक्षेपासून वाचण्यास मदत होते. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःला टीआरएफ म्हणवणाऱ्या एका गटाने स्वीकारली. हा गट संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नव्हता. म्हणूनच, भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने स्वीकारली. हा गट लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. आज पाकिस्तान आणि पीओकेमध्ये केलेली लष्करी कारवाई अत्यंत मोजमापाची, जबाबदार आणि चिथावणीखोर नव्हती," असेही परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

"या निंदनीय दहशतवादी कृत्याला जबाबदार धरण्याची गरज असल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांनीही केले आहे. २५ एप्रिल रोजीच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटमधून टीआरएफचा संदर्भ काढून टाकण्यासाठी पाकिस्तानचा दबाव देखील लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध उघड झाले आहेत," असे विक्रम मिस्री यांनी म्हटलं.

"हल्ल्याला पंधरा दिवस उलटूनही, पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दहशतवादी तळांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्याऐवजी, ते फक्त नकार देण्यात आणि आरोप करण्यात गुंतलेले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूल्सवरील आमच्या गुप्तचर देखरेखीवरून असे दिसून आले की भारतावर आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे. म्हणून, ते आधीच थांबवण्याची आणि रोखण्याची गरज होती. आज सकाळी, भारताने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरला," असेही विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक