शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

"भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता, ते थांबवण्यासाठीच..."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर परराष्ट्र सचिवांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:24 IST

India Air Strike on Pakistan: भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ६ मे च्या रात्री सशस्त्र दलांनी ही कारवाई केली. या कारवाईत, भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली.

ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेपूर्वी, भारतावर आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या.भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी सांगितले की पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता. जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. जातीय दंगली भडकवण्याचाही प्रयत्न झाला. पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत, असं विक्रम मिस्री म्हणाले.

"जगभरातील दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान अजूनही एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. यामुळे दहशतवाद्यांना शिक्षेपासून वाचण्यास मदत होते. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःला टीआरएफ म्हणवणाऱ्या एका गटाने स्वीकारली. हा गट संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नव्हता. म्हणूनच, भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने स्वीकारली. हा गट लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. आज पाकिस्तान आणि पीओकेमध्ये केलेली लष्करी कारवाई अत्यंत मोजमापाची, जबाबदार आणि चिथावणीखोर नव्हती," असेही परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

"या निंदनीय दहशतवादी कृत्याला जबाबदार धरण्याची गरज असल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांनीही केले आहे. २५ एप्रिल रोजीच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटमधून टीआरएफचा संदर्भ काढून टाकण्यासाठी पाकिस्तानचा दबाव देखील लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध उघड झाले आहेत," असे विक्रम मिस्री यांनी म्हटलं.

"हल्ल्याला पंधरा दिवस उलटूनही, पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दहशतवादी तळांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्याऐवजी, ते फक्त नकार देण्यात आणि आरोप करण्यात गुंतलेले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूल्सवरील आमच्या गुप्तचर देखरेखीवरून असे दिसून आले की भारतावर आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे. म्हणून, ते आधीच थांबवण्याची आणि रोखण्याची गरज होती. आज सकाळी, भारताने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरला," असेही विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक