शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

"भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्यांची शक्यता, ते थांबवण्यासाठीच..."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर परराष्ट्र सचिवांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 11:24 IST

India Air Strike on Pakistan: भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला

Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ६ मे च्या रात्री सशस्त्र दलांनी ही कारवाई केली. या कारवाईत, भारतीय हवाई दल, लष्कर आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा सारख्या संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. यानंतर ऑपरेशन सिंदूरवर भारतीय लष्कर, हवाई दल आणि परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेत या कारवाईची माहिती दिली.

ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेपूर्वी, भारतावर आतापर्यंत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या.भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी या कारवाईबाबत माहिती देताना पाकिस्तानवर जोरदार हल्ला केला. ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिवांनी सांगितले की पहलगाम हल्ला अत्यंत क्रूर होता. जम्मू आणि काश्मीरमधील शांतता भंग करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला. जातीय दंगली भडकवण्याचाही प्रयत्न झाला. पहलगाम हल्ल्याच्या तपासात पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी असलेले संबंध उघड झाले आहेत, असं विक्रम मिस्री म्हणाले.

"जगभरातील दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान अजूनही एक सुरक्षित आश्रयस्थान आहे. यामुळे दहशतवाद्यांना शिक्षेपासून वाचण्यास मदत होते. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वतःला टीआरएफ म्हणवणाऱ्या एका गटाने स्वीकारली. हा गट संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबाचा भाग आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नव्हता. म्हणूनच, भारताने दहशतवाद्यांना लक्ष्य केले आणि भारतात पाठवल्या जाणाऱ्या संभाव्य दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पहलगाम हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने स्वीकारली. हा गट लष्कर-ए-तैयबाशी संबंधित आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. आज पाकिस्तान आणि पीओकेमध्ये केलेली लष्करी कारवाई अत्यंत मोजमापाची, जबाबदार आणि चिथावणीखोर नव्हती," असेही परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले.

"या निंदनीय दहशतवादी कृत्याला जबाबदार धरण्याची गरज असल्याचे आवाहन संयुक्त राष्ट्रांनीही केले आहे. २५ एप्रिल रोजीच्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रेस स्टेटमेंटमधून टीआरएफचा संदर्भ काढून टाकण्यासाठी पाकिस्तानचा दबाव देखील लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी असलेले संबंध उघड झाले आहेत," असे विक्रम मिस्री यांनी म्हटलं.

"हल्ल्याला पंधरा दिवस उलटूनही, पाकिस्तानने त्यांच्या हद्दीतील किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या दहशतवादी तळांविरुद्ध कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्याऐवजी, ते फक्त नकार देण्यात आणि आरोप करण्यात गुंतलेले आहेत. पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूल्सवरील आमच्या गुप्तचर देखरेखीवरून असे दिसून आले की भारतावर आणखी हल्ले होण्याची शक्यता आहे. म्हणून, ते आधीच थांबवण्याची आणि रोखण्याची गरज होती. आज सकाळी, भारताने प्रत्युत्तर देण्याचा अधिकार वापरला," असेही विक्रम मिस्री यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइकIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानIndiaभारतPakistanपाकिस्तानwarयुद्धIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक