शहरं
Join us  
Trending Stories
1
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
2
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
3
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
4
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
5
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
6
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
7
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
8
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
9
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
10
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
11
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
12
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
13
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
14
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
15
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
16
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
17
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
18
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
19
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?
20
याला संघ म्हणावे तरी कसे? पाकिस्तान संघाबाबत कोच गॅरी कर्स्टन यांचे धक्कादायक विधान

महाराष्ट्रात बाल लैंगिक शोषणाच्या तक्रारींमध्ये वाढ; केंद्राची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:20 AM

महाराष्ट्रात लैंगिक शोषणाच्या तक्रारीत गेल तीन वर्षात वाढ दिसून आली आहे. कपिल पाटील यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला.

नवी दिल्ली: मोठ्या प्रमाणावर जागरूकता कार्यक्रम राबवणे, शिवाय कठोर कायद्याचा परिमाण दिसला नाही. महाराष्ट्रात लैंगिक शोषणाच्या तक्रारीत गेल तीन वर्षात वाढ दिसून आली आहे. कपिल पाटील यांनी यासंबंधी लेखी प्रश्न विचारला. केंद्र सरकारच्या उत्तरामुळे महाराष्ट्रात अशा तक्रारीत सातत्याने वाढ आढळली.२०१६ साली महाराष्ट्रात १४ हजार ५५९ तक्रारींची नोंद झाली. पुढच्या वर्षी त्यात वाढ होऊ न आकडा १६ हजार ९१८ वर पोहोचला. २०१८ साली १८ हजार ८९२ तक्रारी पोलिसांकडे आल्या. अर्थात अनेक प्रकरणांची तक्रारच केली जात नसल्याने हा आकडा जास्त होता. केंद्रीय दूरसंचार मंत्रालय, माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने कायदा कठोर केला आहे. चाईल्ड पॉर्नोग्राफीवर निर्बंध आहेत. असे व्हिडीओ पाहणे, सोशल मीडियावर पाठवणे गुन्हा आहे. पालकांना जागरूक केले जात आहे. मात्र त्याचा परिणाम अद्याप दिसला नाही.>दूध भेसळ चिंताजनक : दूध व दूग्धजन्य पदार्थांमध्ये होणारी भेसळ गंभीर मुद्दा आहे. राहुल शेवाळे यांनी यासंबंधी केंद्र सरकारला लेखी प्रश्न विचारला. २०१६ साली महाराष्टातून १८१७ नमुने गोळा केले होते. त्यापैकी ३५९ नमुने भेसळयुक्त होते. दिल्लीत ८ पैकी एका नमुन्यात भेसळ होती. प्रमुख कंपन्यांच्या उत्पादनांची तपासणी केली. त्यात ६ हजार ४३२ नमुन्यांपैकी ४० टक्के नमुने भेसळयुक्त आढळले.>महाराष्ट्रातील जंगलात आगी : जंगलात लागणाऱ्या आगी रोखण्यात केंद्राला यश आले नाही. प्रताप जाधव यानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरामुळे आकडेवारीच समोर आली आहे. महाराष्ट्रातील आगीच्या संख्या तशीच आहे.२०१७ साली ५८८९, पुढच्या वर्षी ३४९० तर मागील वर्षी ३२२१ वेळा आगी लागल्या. त्यात अनुक्रमे ४२, ५० व ५४ लाखांची वनसंपदा जळाली.>सूरजकुंड मेळ्यात १५०० कारागीर : देश व सार्क राष्ट्रांमधील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ सूरजकुंड मेळा असल्याचे केंद्राने म्हटले आहे. डॉ. हीना गावित व सुनील तटकरे यांनी प्रश्न विचारला होता. सूरजकुंड मेळ््यात यंदा १५०० कारागीर सहभागी झाले. त्यात १३४४ भारतीय तर सार्क राष्ट्रांमधील ३१ कलाकार होते.>जाहिरातीचे कठोर नियम : अल्पवयीन मुलांना आकर्षीत करण्यासाठी अनेक दुकानांमध्ये तंबाखू, सिगरेट व तत्सम पदार्थांच्या जाहीराती, पॅकेट्स लटकवण्यात येतात का, असा प्रश्न अरविंद सावंत व कृपाल तुमाने यांनी विचारला. आरोग्य मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेत विस्तृत्त उत्तर दिले. तंबाखू, सिगरेट, गुटख्याच्या जाहीरातीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ज्याचे उल्लंघन खपवून घेतले जात नाही, असे केंद्राने म्हटले आहे.