शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
2
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
3
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा
4
अजित पवारांचे माहित नाही, पण भुजबळ नाराज असल्याचे ऐकले, त्यांना अंदाज आलाय; जयंत पाटलांचे स्पष्ट संकेत
5
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
6
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
7
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
8
८४ वर्षांपूर्वी दोन भावांनी McDonald'sची केलेली सुरुवात; आज ११९ देशांत ४२००० पेक्षा अधिक आऊटलेस्ट
9
सावधान! इंटरनेटलाच डॉक्टर मानता?; तर तुम्हीही ठरू शकता Idiot Syndrome चे बळी
10
Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का
11
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
12
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
13
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
14
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
15
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
16
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
17
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
18
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
19
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
20
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'

मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर; NITI आयोगाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 9:14 PM

2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आली.

नवी दिल्ली: केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आतापर्यंत देशभरातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. सर्वाधिक 6 कोटी लोक उत्तर प्रदेशातील असून, त्यानंतर बिहार आणि मध्य प्रदेशचा नंबर लागतो आहे. केंद्र सरकारची थिंक टँक असलेल्या NITI आयोगाने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात 2013-14 ते 2022-23 या कालावधीत 24.82 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक (12 कोटी) लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. NITI आयोगानुसार, देशातील बहुआयामी दारिद्र्याचा दर 2013-14 मध्ये 29.17% होता, जो 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आला. या आकडेवारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काम करत राहू."

बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय?NITI आयोगानुसार, बहुआयामी दारिद्र्य हे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाच्या आधारे मोजले जाते. त्यात पोषणमान, बालमृत्यू दर, माता आरोग्य, शाळेत किती वर्षे अभ्यास केला, शाळेतील उपस्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज सुविधा, घर, मालमत्ता आणि बँक खाते, असे 12 निर्देशक आहेत. भारतात, बहुआयामी गरिबी निर्देशांक मोजण्यासाठी 12 निर्देशक वापरले जातात, तर जागतिक स्तरावर फक्त 10 आहेत.

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची तुलना भारतातील गरिबीचा अंदाज काढण्याच्या पारंपारिक आणि अधिकृत पद्धतींशी होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. NITI आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 आणि 5 मधून डेटा घेण्यात आला आहे.

गरिबी कशी कमी झाली?नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद म्हणाले की, 9 वर्षांत 24.82 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. त्यानुसार दरवर्षी 2.75 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले की, बहुआयामी गरिबी 1 टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि या दिशेने वेगाने काम केले जात आहे. अहवालानुसार, 2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2015-16 मध्ये 24.85% पर्यंत खाली आली. 2019-21 मध्ये ही पातळी 15% पेक्षा कमी झाली. तर, 2022-23 मध्ये ती आणखी कमी होऊन 11.28% झाली.

गरिबी कमी होण्याचे कारण काय?NITI आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या योजनांनी करोडो लोकांना गरिबीतून बाहेर येण्यास मदत केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 81.35 कोटींहून अधिक लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. यात खेडी लोकसंख्येच्या 75% आणि शहराच्या 50% लोकसंख्येचा समावेश आहे. याशिवाय सरकार पोषण अभियानदेखील चालवत आहे, ज्याचा फायदा सुमारे 10 कोटी बालके आणि मातांना होत आहे. गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व अभियान राबविण्यात येत असून, त्याचा लाभ सुमारे 4 कोटी महिलांना मिळत आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 10 कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन मोफत देण्यात आले आहेत, ज्याचा 31 कोटी लोकांना फायदा झाला आहे. यासोबतच प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 50 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 कोटींहून अधिक लोकांना घरे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा