शहरं
Join us  
Trending Stories
1
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
2
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
3
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
4
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
5
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
6
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
7
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
8
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
9
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
10
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
11
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
13
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
14
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
15
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
16
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
17
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
18
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
19
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
20
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...

मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर; NITI आयोगाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 21:15 IST

2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आली.

नवी दिल्ली: केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आतापर्यंत देशभरातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. सर्वाधिक 6 कोटी लोक उत्तर प्रदेशातील असून, त्यानंतर बिहार आणि मध्य प्रदेशचा नंबर लागतो आहे. केंद्र सरकारची थिंक टँक असलेल्या NITI आयोगाने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात 2013-14 ते 2022-23 या कालावधीत 24.82 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक (12 कोटी) लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. NITI आयोगानुसार, देशातील बहुआयामी दारिद्र्याचा दर 2013-14 मध्ये 29.17% होता, जो 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आला. या आकडेवारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काम करत राहू."

बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय?NITI आयोगानुसार, बहुआयामी दारिद्र्य हे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाच्या आधारे मोजले जाते. त्यात पोषणमान, बालमृत्यू दर, माता आरोग्य, शाळेत किती वर्षे अभ्यास केला, शाळेतील उपस्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज सुविधा, घर, मालमत्ता आणि बँक खाते, असे 12 निर्देशक आहेत. भारतात, बहुआयामी गरिबी निर्देशांक मोजण्यासाठी 12 निर्देशक वापरले जातात, तर जागतिक स्तरावर फक्त 10 आहेत.

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची तुलना भारतातील गरिबीचा अंदाज काढण्याच्या पारंपारिक आणि अधिकृत पद्धतींशी होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. NITI आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 आणि 5 मधून डेटा घेण्यात आला आहे.

गरिबी कशी कमी झाली?नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद म्हणाले की, 9 वर्षांत 24.82 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. त्यानुसार दरवर्षी 2.75 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले की, बहुआयामी गरिबी 1 टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि या दिशेने वेगाने काम केले जात आहे. अहवालानुसार, 2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2015-16 मध्ये 24.85% पर्यंत खाली आली. 2019-21 मध्ये ही पातळी 15% पेक्षा कमी झाली. तर, 2022-23 मध्ये ती आणखी कमी होऊन 11.28% झाली.

गरिबी कमी होण्याचे कारण काय?NITI आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या योजनांनी करोडो लोकांना गरिबीतून बाहेर येण्यास मदत केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 81.35 कोटींहून अधिक लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. यात खेडी लोकसंख्येच्या 75% आणि शहराच्या 50% लोकसंख्येचा समावेश आहे. याशिवाय सरकार पोषण अभियानदेखील चालवत आहे, ज्याचा फायदा सुमारे 10 कोटी बालके आणि मातांना होत आहे. गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व अभियान राबविण्यात येत असून, त्याचा लाभ सुमारे 4 कोटी महिलांना मिळत आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 10 कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन मोफत देण्यात आले आहेत, ज्याचा 31 कोटी लोकांना फायदा झाला आहे. यासोबतच प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 50 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 कोटींहून अधिक लोकांना घरे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा