शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारच्या काळात देशातील कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर; NITI आयोगाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 21:15 IST

2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आली.

नवी दिल्ली: केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आतापर्यंत देशभरातील 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. सर्वाधिक 6 कोटी लोक उत्तर प्रदेशातील असून, त्यानंतर बिहार आणि मध्य प्रदेशचा नंबर लागतो आहे. केंद्र सरकारची थिंक टँक असलेल्या NITI आयोगाने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात 2013-14 ते 2022-23 या कालावधीत 24.82 कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आल्याचे सांगण्यात आले आहे. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक (12 कोटी) लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. NITI आयोगानुसार, देशातील बहुआयामी दारिद्र्याचा दर 2013-14 मध्ये 29.17% होता, जो 2022-23 मध्ये 11.28% पर्यंत खाली आला. या आकडेवारीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी समृद्ध भविष्य सुनिश्चित करण्यासाठी आम्ही काम करत राहू."

बहुआयामी दारिद्र्य म्हणजे काय?NITI आयोगानुसार, बहुआयामी दारिद्र्य हे आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाच्या आधारे मोजले जाते. त्यात पोषणमान, बालमृत्यू दर, माता आरोग्य, शाळेत किती वर्षे अभ्यास केला, शाळेतील उपस्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज सुविधा, घर, मालमत्ता आणि बँक खाते, असे 12 निर्देशक आहेत. भारतात, बहुआयामी गरिबी निर्देशांक मोजण्यासाठी 12 निर्देशक वापरले जातात, तर जागतिक स्तरावर फक्त 10 आहेत.

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची तुलना भारतातील गरिबीचा अंदाज काढण्याच्या पारंपारिक आणि अधिकृत पद्धतींशी होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. NITI आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 आणि 5 मधून डेटा घेण्यात आला आहे.

गरिबी कशी कमी झाली?नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद म्हणाले की, 9 वर्षांत 24.82 कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत. त्यानुसार दरवर्षी 2.75 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले की, बहुआयामी गरिबी 1 टक्क्यांनी कमी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि या दिशेने वेगाने काम केले जात आहे. अहवालानुसार, 2005-06 मध्ये गरिबीची पातळी 55.34% होती, जी 2015-16 मध्ये 24.85% पर्यंत खाली आली. 2019-21 मध्ये ही पातळी 15% पेक्षा कमी झाली. तर, 2022-23 मध्ये ती आणखी कमी होऊन 11.28% झाली.

गरिबी कमी होण्याचे कारण काय?NITI आयोगाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या योजनांनी करोडो लोकांना गरिबीतून बाहेर येण्यास मदत केली. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 81.35 कोटींहून अधिक लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. यात खेडी लोकसंख्येच्या 75% आणि शहराच्या 50% लोकसंख्येचा समावेश आहे. याशिवाय सरकार पोषण अभियानदेखील चालवत आहे, ज्याचा फायदा सुमारे 10 कोटी बालके आणि मातांना होत आहे. गरोदर महिलांसाठी प्रधानमंत्री मातृत्व अभियान राबविण्यात येत असून, त्याचा लाभ सुमारे 4 कोटी महिलांना मिळत आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 10 कोटींहून अधिक एलपीजी कनेक्शन मोफत देण्यात आले आहेत, ज्याचा 31 कोटी लोकांना फायदा झाला आहे. यासोबतच प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत 50 कोटींहून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 4 कोटींहून अधिक लोकांना घरे देण्यात आली आहेत, ज्यामुळे त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली आहे.

टॅग्स :NIti Ayogनिती आयोगCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा