शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची रणनीती! निवडणुकीपूर्वीच मित्रपक्षाला मुख्यमंत्रिपदाचं 'गिफ्ट'; दक्षिणेत राजकारण तापणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:42 IST

मंत्री पीयूष गोयल यांनी चेन्नई येथे एआयडिएमकेचे नेते पलानीस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जागावाटपावर चर्चा केली.

चेन्नई - तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुका यावर्षी पार पडणार आहे. त्यातून राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. भाजपा नेते आणि तामिळनाडूचे प्रभारी म्हणून मंत्री पीयूष गोयल यांनी आज तामिळनाडू दौरा केला. या दौऱ्यात गोयल यांनी मोठी घोषणा केली. आगामी निवडणुका एनडीएचे घटक पक्ष असलेल्या एआयडिएमकेचे नेते के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात लढवल्या जातील. त्यामुळे मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा म्हणून पलानीस्वामी यांचं नाव समोर आले आहे.

मंत्री पीयूष गोयल यांनी चेन्नई येथे एआयडिएमकेचे नेते पलानीस्वामी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी जागावाटपावर चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पीयूष गोयल म्हणाले की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूत पलानीस्वामी मिळून एनडीए डिएमके सरकारला बाहेरचा रस्ता दाखवेल. मी आज पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि पक्षाचे अध्यक्ष नितीन नबीन यांच्या शुभेच्छा घेऊन इथं आलोय. केंद्रात पंतप्रधान आणि तामिळनाडूत पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात एनडीए आघाडी भ्रष्ट, अयशस्वी आणि विकासविरोधी डिएमके सरकारला सत्तेतून खाली खेचेल. या निवडणुकीत डिएमकेचा पराभव निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर पीयूष गोयल हे आमच्या घरी आले त्याचा आनंद आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन हेदेखील सोबत होते. आम्ही निवडणुकीबाबतीत चर्चा केली. त्याशिवाय उद्या होणाऱ्या सभेच्या तयारीचाही आढावा घेतला. जवळपास ५ लाख लोक या सभेला येतील. तामिळनाडूत सरकार सर्वच क्षेत्रात अयशस्वी ठरले आहे. भाजपा आणि एआयडिएमके आघाडी मजबूत आहे असं के. पलानीस्वामी यांनी म्हटलं. 

नेतृत्वाबाबत स्पष्ट संदेश

पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करून एनडीएने निवडणुकीपूर्वीच नेतृत्वाबाबत होणारा संभ्रम दूर केला आहे. जर एनडीए सत्तेत आली तर राज्याला स्थिर आणि विकासाच्या मार्गावर चालणारे सरकार मिळेल असं पीयूष गोयल यांनी म्हटलं. डिएमके सरकारच्या काळात युवक, शेतकरी आणि महिलांसाठी काही काम झाले नाही. सध्याचे सरकार भ्रष्ट आणि कामचोर झाल्याने त्यांना सत्ता चालवण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असा घणाघातही गोयल यांनी केला. 

दरम्यान, तामिळनाडूत एनडीए त्यांचा विस्तार करत आहे. टीटीवी दिनाकरन यांचा एएमएमके आणि पीएमके हे पक्ष एनडीएत सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी मदुरै येथे रॅली झाली होती. त्यानंतर ही घडामोड घडली. पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी चेन्नईत एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. ही बैठक पलानीस्वामी यांच्या घरी होती. त्यात भाजपा आमदार वनथी श्रीनिवासनही सहभागी होती. तामिळनाडूत नेतृत्व निश्चित केल्याने आणि नवीन पक्ष एनडीएत सहभागी झाल्याने डिएमकेविरोधात भाजपा तगडी फौज मैदानात उतरवत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.  

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीpiyush goyalपीयुष गोयलNarendra Modiनरेंद्र मोदी