शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

राजस्थानमध्ये भीषण अपघात, लग्नाहून परतताना पुलावरून नदीत पडली कार, वरासह नऊ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 11:19 IST

Accident News: राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर मोठा अपघात घडला आहे. रात्री उशिरा लग्नसमारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला.

जयपूर - राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर मोठा अपघात घडला आहे. रात्री उशिरा लग्नसमारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. ही वरात चौथ का बरवाडा येथून कोटा येथे गेली होती. ते रात्री उशिरा परतत होते. या कारमधून वरासह ९ जण प्रवास करत होते.

दरम्यान, या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला आहे. अपघाताची माहिती मिलाल्यावर प्रशासन, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कारमधून मृतदेह बाहेर काढले. तेव्हा घटनास्थळावर लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती.

अपघाताचे वृत्त समजल्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दु:ख व्यक्त केले आहे. या अपघातात अनेक जणांचा झालेल्या आकस्मिक मृत्यू धक्कादायक आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रति मी संवेदना व्यक्त करतो, असे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातRajasthanराजस्थानmarriageलग्न