शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

केरळमध्ये मोठी दुर्घटना! जीप दरीत कोसळल्याने नऊ जणांचा मृत्यू; २ जण गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 19:31 IST

केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली.

वायनाड : केरळमधील वायनाडमध्ये शुक्रवारी एक वेदनादायक दुर्घटना घडली. वायनाड जिल्ह्यात प्रवाशांनी भरलेल्या जीपला अपघात झाला अन् नऊ जणांनी आपला जीव गमावला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक महिला असल्याचे सांगितलं जात आहे. वायनाड पोलिसांनी सांगितलं की, केरळच्या वायनाड जिल्ह्यात एका जीपला झालेल्या अपघातात किमान नऊ जण ठार झाले आहेत.

मृतांमध्ये बहुतांश महिला असल्याचे पोलिसांनी सांगितले. माहितीनुसार, दुपारी साडेतीनच्या सुमारास वल्लाड-मानंथवाडी रस्त्यावर हा अपघात झाला. गाडीत १२ जण होते. वायनाड हा काँग्रेस नेते राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ आहे. त्यांनी देखील या अपघातावर शोक व्यक्त केला.

या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, खासदार राहुल गांधी म्हणाले की, वायनाडमधील मानंथवाडी येथे झालेल्या जीप दुर्घटनेने मला खूप दुःख झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तातडीने पाऊले उचलण्यास सांगितले आहे. माझे विचार शोकाकुल कुटुंबांसोबत आहेत. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो.

एका स्थानिक रहिवाशाने मीडियाला सांगितले की, जीप एका खासगी चहाच्या बागेत काम करणाऱ्या महिलांना घेऊन मक्कीमालाला परतत होती. या अपघातात जखमी झालेल्यांना मानंथवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्यातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. 

टॅग्स :KeralaकेरळAccidentअपघातRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसDeathमृत्यू