शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

महाभियोग : ... तर काँग्रेस घेणार सर्वोच्च न्यायालयात धाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 9:08 PM

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दिलेली महाभियोगाची नोटीस राज्यसभेच्या सभापतींनी फेटाळल्यास त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

नवी दिल्ली -  सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याविरोधात दिलेली महाभियोगाची नोटीस राज्यसभेच्या सभापतींनी फेटाळल्यास त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तसे संकेत दिले आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे एक नेते म्हणाले, राज्यसभेच्या सभापतींच्या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकते. तसेच त्याची कायदेशीर समीक्षा होऊ शकते. सरन्यायाधीशांवर यासाठी नैतिक दबाव बनवण्यात येत आहे. जेणेकरून महाभियोग प्रस्ताव सादर केल्यानंतर ते आपल्या कायदेशीर उत्तरदायित्वापासून बाजूला होतील, असे काँग्रेसच्या एका नेत्याने सांगितले. याआधीसुद्धा महाभियोगाचा सामना करणारे न्यायधीश आपल्या कायदेशीर कामकाजापासून दूर झाले होते. त्यामुळे सध्याच्या सरन्यायाधीशांनीही असेच केले पाहिजे, असेही काँग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, महाभियोगाच्या प्रस्तावावर लवकरात लवकर निर्णय होईल, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना हटवण्यासाठी काँग्रेसने 71 खासदारांच्या स्वाक्ष-या असलेला प्रस्ताव राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्याकडे शुक्रवारी सोपवला होता. तसेच राज्यसभा सभापतींनी या प्रस्तावाला मान्यता द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन केली होती. आम्ही सरन्यायाधीश दीपक मिश्रांविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव आणला आहे. या प्रस्तावावर 71 खासदारांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. त्यामुळे आता राज्यसभेच्या अध्यक्षांनी यावर निर्णय घ्यावा, असे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यावेळी म्हणाले होते. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी पदाचा दुरुपयोग करत अनेक प्रकरणे हाताळली आहेत. त्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेची स्वायत्तता धोक्यात आली आहे. त्यांच्यापासून देशाच्या न्यायव्यवस्थेला धोका आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणला, अशी टीका काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली होती. 

टॅग्स :Deepak Mishraदीपक मिश्राSupreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस