शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:05 IST

खासदार कंगना राणौत यांनी कृषी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे.

नवी दिल्ली - भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिनं कृषी कायद्यावरून केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. कंगनाच्या या विधानानं विरोधी काँग्रेसलाभाजपाविरोधात आयतं कोलीत सापडलं. त्यानंतर काही वेळाने कंगनानं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र हाच मुद्दा हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाचं टेन्शन वाढवणारा ठरला आहे.

कृषी कायद्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कंगनानं स्पष्टीकरण देत हे माझं व्यक्तिगत मत आहे असं म्हटलं असलं तरी आता त्याचा फायदा नाही, कारण कंगनाच्या या विधानानं हरियाणा भाजपाला विरोधकांनी कोंडीत पकडले आहे. कंगनानं हे विधान मंगळवारी त्यांच्या मंडी मतदारसंघात केले मात्र त्याच्या प्रतिक्रिया हरियाणात उमटायला सुरुवात झाली. हे कंगनाचे बोल नाहीत भाजपाचे आहेत असं काँग्रेसनं निवडणुकीत प्रचार सुरू केला.

मागील महिन्यातही कंगनानं अशाच प्रकारे शेतकऱ्यांवर विधान केल्यानं वाद झाला. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाकडून कंगना राणौत यांना समज देण्यात आली होती. परंतु महिनाभरातच कंगनाने पुन्हा एकदा भाजपाला अडचणीत आणलं आहे. ३ वर्षापूर्वी २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी केंद्रातील सरकारविरोधात मोठं आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी दिल्लीला सर्व बाजूने घेराव घातला. या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी विधेयके मागे घ्यावी लागली. हे आंदोलन आता कुठे चर्चेत नव्हते परंतु कंगनाच्या विधानाने पुन्हा ते भडकण्याची शक्यता आहे.

काय म्हणाली होती कंगना?

मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना राणौत यांनी बोलताना ३ कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते, ते पुन्हा लागू करायला हवेत. काही राज्यातील शेतकऱ्यांमुळे सरकारने हे कायदे रद्द केले होते. मला माहिती आहे माझ्या या विधानावर वाद होईल परंतु ३ कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत, शेतकऱ्यांना माफी मागायला हवी. स्वहितासाठी हे ३ कृषी कायदे आणावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी करावी असं आवाहन कंगनाने केले. मात्र त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले.  

दरम्यान, वाद चिघळताच कंगनानं व्हिडिओ टाकत यू टर्न घेतला.'जेव्हा कृषीविषयक कायदे आणले, तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी त्याचे समर्थन केले. पण संवेदनशीलता आणि सहानुभूतीमुळे पंतप्रधानांनी कायदे मागे घेतले. त्यांच्या शब्दाची प्रतिष्ठा राखणे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मी आता कलाकार नसून भाजपची  कार्यकर्ता आहे, हेही लक्षात ठेवावे लागेल. माझे विचार माझे नसावेत, पक्षाची भूमिका असली पाहिजे, असंही कंगना राणौत म्हणाली. 'जर माझ्या बोलण्याने आणि विचाराने कोणाची निराशा झाली असेल तर मला खेद आहे,मी आपले शब्द मागे घेते, असंही कंगना राणौत म्हणाल्या.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरीHaryanaहरयाणा