शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:05 IST

खासदार कंगना राणौत यांनी कृषी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे.

नवी दिल्ली - भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिनं कृषी कायद्यावरून केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. कंगनाच्या या विधानानं विरोधी काँग्रेसलाभाजपाविरोधात आयतं कोलीत सापडलं. त्यानंतर काही वेळाने कंगनानं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र हाच मुद्दा हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाचं टेन्शन वाढवणारा ठरला आहे.

कृषी कायद्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कंगनानं स्पष्टीकरण देत हे माझं व्यक्तिगत मत आहे असं म्हटलं असलं तरी आता त्याचा फायदा नाही, कारण कंगनाच्या या विधानानं हरियाणा भाजपाला विरोधकांनी कोंडीत पकडले आहे. कंगनानं हे विधान मंगळवारी त्यांच्या मंडी मतदारसंघात केले मात्र त्याच्या प्रतिक्रिया हरियाणात उमटायला सुरुवात झाली. हे कंगनाचे बोल नाहीत भाजपाचे आहेत असं काँग्रेसनं निवडणुकीत प्रचार सुरू केला.

मागील महिन्यातही कंगनानं अशाच प्रकारे शेतकऱ्यांवर विधान केल्यानं वाद झाला. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाकडून कंगना राणौत यांना समज देण्यात आली होती. परंतु महिनाभरातच कंगनाने पुन्हा एकदा भाजपाला अडचणीत आणलं आहे. ३ वर्षापूर्वी २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी केंद्रातील सरकारविरोधात मोठं आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी दिल्लीला सर्व बाजूने घेराव घातला. या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी विधेयके मागे घ्यावी लागली. हे आंदोलन आता कुठे चर्चेत नव्हते परंतु कंगनाच्या विधानाने पुन्हा ते भडकण्याची शक्यता आहे.

काय म्हणाली होती कंगना?

मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना राणौत यांनी बोलताना ३ कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते, ते पुन्हा लागू करायला हवेत. काही राज्यातील शेतकऱ्यांमुळे सरकारने हे कायदे रद्द केले होते. मला माहिती आहे माझ्या या विधानावर वाद होईल परंतु ३ कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत, शेतकऱ्यांना माफी मागायला हवी. स्वहितासाठी हे ३ कृषी कायदे आणावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी करावी असं आवाहन कंगनाने केले. मात्र त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले.  

दरम्यान, वाद चिघळताच कंगनानं व्हिडिओ टाकत यू टर्न घेतला.'जेव्हा कृषीविषयक कायदे आणले, तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी त्याचे समर्थन केले. पण संवेदनशीलता आणि सहानुभूतीमुळे पंतप्रधानांनी कायदे मागे घेतले. त्यांच्या शब्दाची प्रतिष्ठा राखणे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मी आता कलाकार नसून भाजपची  कार्यकर्ता आहे, हेही लक्षात ठेवावे लागेल. माझे विचार माझे नसावेत, पक्षाची भूमिका असली पाहिजे, असंही कंगना राणौत म्हणाली. 'जर माझ्या बोलण्याने आणि विचाराने कोणाची निराशा झाली असेल तर मला खेद आहे,मी आपले शब्द मागे घेते, असंही कंगना राणौत म्हणाल्या.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरीHaryanaहरयाणा