शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतमुळं हरियाणात भाजपाला मोठा फटका?; काँग्रेसला मिळालं आयतं कोलीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 12:05 IST

खासदार कंगना राणौत यांनी कृषी कायद्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी मिळाली आहे.

नवी दिल्ली - भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौत हिनं कृषी कायद्यावरून केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. कंगनाच्या या विधानानं विरोधी काँग्रेसलाभाजपाविरोधात आयतं कोलीत सापडलं. त्यानंतर काही वेळाने कंगनानं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र हाच मुद्दा हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाचं टेन्शन वाढवणारा ठरला आहे.

कृषी कायद्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कंगनानं स्पष्टीकरण देत हे माझं व्यक्तिगत मत आहे असं म्हटलं असलं तरी आता त्याचा फायदा नाही, कारण कंगनाच्या या विधानानं हरियाणा भाजपाला विरोधकांनी कोंडीत पकडले आहे. कंगनानं हे विधान मंगळवारी त्यांच्या मंडी मतदारसंघात केले मात्र त्याच्या प्रतिक्रिया हरियाणात उमटायला सुरुवात झाली. हे कंगनाचे बोल नाहीत भाजपाचे आहेत असं काँग्रेसनं निवडणुकीत प्रचार सुरू केला.

मागील महिन्यातही कंगनानं अशाच प्रकारे शेतकऱ्यांवर विधान केल्यानं वाद झाला. त्यावेळी पक्षाच्या नेतृत्वाकडून कंगना राणौत यांना समज देण्यात आली होती. परंतु महिनाभरातच कंगनाने पुन्हा एकदा भाजपाला अडचणीत आणलं आहे. ३ वर्षापूर्वी २०२१ मध्ये शेतकऱ्यांनी केंद्रातील सरकारविरोधात मोठं आंदोलन छेडले. शेतकऱ्यांनी दिल्लीला सर्व बाजूने घेराव घातला. या आंदोलनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कृषी विधेयके मागे घ्यावी लागली. हे आंदोलन आता कुठे चर्चेत नव्हते परंतु कंगनाच्या विधानाने पुन्हा ते भडकण्याची शक्यता आहे.

काय म्हणाली होती कंगना?

मंडी लोकसभा मतदारसंघात कंगना राणौत यांनी बोलताना ३ कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर होते, ते पुन्हा लागू करायला हवेत. काही राज्यातील शेतकऱ्यांमुळे सरकारने हे कायदे रद्द केले होते. मला माहिती आहे माझ्या या विधानावर वाद होईल परंतु ३ कृषी कायदे पुन्हा लागू करायला हवेत, शेतकऱ्यांना माफी मागायला हवी. स्वहितासाठी हे ३ कृषी कायदे आणावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी करावी असं आवाहन कंगनाने केले. मात्र त्यांच्या या विधानावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले.  

दरम्यान, वाद चिघळताच कंगनानं व्हिडिओ टाकत यू टर्न घेतला.'जेव्हा कृषीविषयक कायदे आणले, तेव्हा आपल्यापैकी अनेकांनी त्याचे समर्थन केले. पण संवेदनशीलता आणि सहानुभूतीमुळे पंतप्रधानांनी कायदे मागे घेतले. त्यांच्या शब्दाची प्रतिष्ठा राखणे हे आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे. मी आता कलाकार नसून भाजपची  कार्यकर्ता आहे, हेही लक्षात ठेवावे लागेल. माझे विचार माझे नसावेत, पक्षाची भूमिका असली पाहिजे, असंही कंगना राणौत म्हणाली. 'जर माझ्या बोलण्याने आणि विचाराने कोणाची निराशा झाली असेल तर मला खेद आहे,मी आपले शब्द मागे घेते, असंही कंगना राणौत म्हणाल्या.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाcongressकाँग्रेसFarmerशेतकरीHaryanaहरयाणा