शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
2
दिल्लीत गेलात म्हणजे मराठी माणसाला विसरू नका; राज ठाकरेंची खा. नरेश म्हस्केंना सूचना
3
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
4
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
5
‘’अरविंद केजरीवालजी, आम्हाला १ हजार रुपये द्या’’, महिलांचं दिल्ली सरकारविरोधात आंदोलन
6
बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी
7
पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात मुस्लीम मंत्री का नाही? संजय राऊतांनी सांगितली 'थिएरी'
8
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer
9
दादरचा हा फूटपाथ पालिकेनं नव्हे, तर चोरांनी खोदला! लाखो रुपये किमतीची MTNL केबल लंपास
10
Shares to Buy : शेअर बाजाराच्या चढ-उतारादरम्यान ब्रोकरेज SBI सह 'या' शेअर्सवर बुलिश, दिलं 'बाय' रेटिंग
11
Smita Shewale : Video - "मी जगूच नाही शकणार..."; 'मुरांबा'मधील 'जान्हवी'ला निरोप देताना 'रमा' झाली भावूक
12
"भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर..."; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर
13
जंगल मे भौकाल! Mirzapur 3 चा टीझर आऊट, रिलीज डेटही समोर; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
14
Tejashwi Yadav : "नरेंद्र मोदी यावेळी सर्वात कमकुवत पंतप्रधान ठरतील"; तेजस्वी यादव यांचा घणाघात
15
Fact Check : भाजपाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोदी सर्व युजर्सना देताहेत मोफत रिचार्ज?, हे आहे 'सत्य'
16
२०१४ मध्ये भूतान, २०१९ मध्ये मालदीव... तिसऱ्या कार्यकाळात 'या' देशापासून सुरू होणार PM मोदींचा विदेश दौरा 
17
शीख समुदायाबद्दल अपशब्द; हरभजन सिंगचा संताप, अखेर पाकिस्तानी खेळाडूचा माफीनामा
18
"लाज वाटू दे, तुमच्या आई-बहिणींची अब्रू..."; हरभजन सिंगने पाकिस्तानी क्रिकेटरला सुनावले
19
खातेवाटप जाहीर होताच मंत्री ॲक्शन मोडमध्ये, आज कोणते मंत्री पदभार स्वीकारणार? पाहा संपूर्ण माहिती...
20
खासदार पप्पू यादव यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल; म्हणाले, "जो दोषी असेल त्याला फाशी द्यावी"

बेकायदेशीररित्या राहणा-या रोहिंग्यांना परत पाठवणे आवश्यकच - गृहराज्यमंत्री रिजिजू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2017 12:48 AM

भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे.

मुंबई, दि. 6 - भारतात बेकायदेशीररित्या घुसलेल्या रोहिंग्यांना परत पाठवणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले आहे. संसदेच्या मान्सून अधिवेशनात म्यानमारमधून भारतात घुसलेल्या रोहिंग्यांची आकडेवारी रिजिजू यांनी जाहीर केली होती, तसेच जम्मू आणि काश्मीर राज्यात सर्वाधीक रोहिंग्या राहात असल्याचे सांगितले होते.

बेकायदेशीर स्थलांतरितांना पुन्हा मायदेशी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारांना देत आहोत असेही रिजिजू यांनी संसदेत सांगितले होते. त्यांच्या या वक्त्वचा मानवाधिकार संघटनांनी निषेध केला होता. हैदराबादेत राहणार्या रोहिंग्यांनी तर आम्हाला ठार मारा पण परत पाठवू नका अशी विनंती सरकारकडे केली होती. जर आम्ही परत म्यानमारला गेलो तर आमचे तुकडे केले जातील अशीही भीती त्यांनी व्यक्त केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाने कालच केंद्र सरकारकडे तुम्ही रोहिंग्याना परत पाठवण्याचा का विचार करत आहात असा प्रश्न विचारला होता, त्यानंतर दुसर्याच दिवशी रिजिजू यांनी हे वक्तव्य केले आहे. कायदेशीर बाबीमध्ये मला आता पडायचे नाही मात्र रोहिंग्या हे भारतात बेकायदेशीररित्या राहात आहेत, त्यांना परत पाठवणे आवश्यक आहे.भारताने शक्य तितक्या स्थलांतरितांना सामावून घेतले आहे, आता बेकायदेशीर स्थलांतरितांना सामावून घेणे अशक्य आहे असे रिजिजू म्हणाले आहेत. म्यानमारमध्ये वांशिक तणाव उफाळला असतानाच आणि रोहिंग्यांसह हिंदू जीव मुठीत धरुन बांगलादेशच्या दिशेने पळत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा म्यानमार दौरा सुरु आहे. त्यामुळे ते या मुद्द्यावर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. लोकशाहीवादी नेत्या आणि म्यानमारच्या स्टेट कौन्सीलर आंग सान सू ची या सत्तेत आल्यावर अल्पसंख्यांकांचे रक्षण करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसे झालेले नाही. बौद्ध धर्मगुरु दलाई लामा यांच्यासह जगातील अनेक नेत्यांनी म्यानमारमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्वरित पावले उचला अशी विनंती त्यांना केली आहे तर जगातील अनेक नेत्यांनी व संघटनांनी सू ची यांच्यावर टीकाही केली आहे.