शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
6
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
7
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
8
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
9
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
10
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
11
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
12
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
13
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
14
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
15
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
16
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
17
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
18
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
19
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
20
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारकडून लोकशाही परंपरेची उपेक्षा

By admin | Updated: May 15, 2015 00:21 IST

लोकसभेत बहुमत मिळाल्यामुळे मोदी सरकार लोकशाही परंपरांची घोर उपेक्षा करीत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचा दुटप्पीपणा उघड झाला

शीलेश शर्मा, नवी दिल्लीलोकसभेत बहुमत मिळाल्यामुळे मोदी सरकार लोकशाही परंपरांची घोर उपेक्षा करीत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपचा दुटप्पीपणा उघड झाला आहे, अशा शब्दात काँग्रेसने गुरुवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.ज्या महत्त्वपूर्ण विधेयकांची संसदेने समीक्षा करणे आवश्यक होते, ती विधेयके भाजपा सरकारने बहुमताच्या अहंकारापोटी समीक्षा न करताच थेट पारित करण्याचा मार्ग निवडला आणि विरोधकांवर सहकार्य न करण्याचा आरोप लावला. सामान्य विधेयकाला मनी विधेयक सांगून राज्यसभेकडे दुर्लक्ष केले. कारण राज्यसभेत आपल्याला बहुमत नाही, हे सरकारला ठाऊक होते. म्हणून विधेयक मनी विधेयकाच्या नावावर मांडले तर राज्यसभेत ते रोखले जाणार नाही, असा सरकारचा हेतू होता, असे लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभेतील काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.नियमानुसार मनी विधेयक रोखण्याचा अधिकार राज्यसभेला नाही आणि राज्यसभेने हे विधेयक पारित जरी केले नाही तरी ते लोकसभेने पारित केले असेल तर ते पारित झाल्याचे मानले जाते. राज्यसभेत असे विधेयक मांडणे ही केवळ औपचारिकता असते, हे येथे उल्लेखनीय आहे.सरकारचे असे वागणे हा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे खरगे म्हणाले. ५५ विधेयकांपैकी वेळ ५ किंवा ६ विधेयकेच संसदेच्या स्थायी समितीकडे पाठविण्यात आली आणि उर्वरित विधेयके सरकारने आपल्या बहुमताचा हवाला देऊन बळजबरीने पारित करवून घेतली, असा आरोप खरगे यांनी केला.गुलाम नबी आझाद म्हणाले, काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष राज्यसभेत जीएसटी आणि भूसंपादन विधेयके पारित होऊ देणार नाहीत, हे ठाऊक असल्यामुळे सरकारने नाईलाजास्तव ही दोन्ही विधेयके संसदेच्या समित्यांकडे पाठविली. संसदेत विरोधी पक्ष असताना भाजपने बांगला देश भूमी आणि सीमा विधेयक पारित होऊ दिले नव्हते. ज्या विधेयकामुळे एक इंच जमीनही जाणार असेल तर अशा विधेयकाचे आम्ही समर्थन करणार नाही, असे भाजपाचे म्हणणे होते. परंतु सत्तेवर आल्यानंतर भाजपने आता तेच विधेयक आणले. हा भाजपाचा दुटप्पीपणा नाही तर आणखी काय आहे?