शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

'बालाकोटचे श्रेय घेता, तर पुलवामाची जबाबदारी घ्या'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 7:55 AM

तेलगू देसम : जवानांना बुलेटप्रूफ बसेस का दिल्या नाहीत?

विशाखापट्टणम : केंद्रातील मोदी सरकार बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घेण्यास तात्काळ पुढे येत असेल, तर या सरकारने जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील अतिरेकी हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे, असे तेलगू देसम पार्टीने (टीडीपी) म्हटले आहे.टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते दिनकर लंका यांनी म्हटले आहे की, सीआरपीएफच्या वाहनांना बुलेटप्रूफ कवच देण्यात मोदी सरकार अयशस्वी झाले आहे. त्यामुळेच १४ फेब्रुवारी रोजी झालेला हल्ला आपण रोखू शकलो नाही व ४० जवान शहीद झाले.

या हल्ल्याला सरकारचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ७ सप्टेंबर २०१७ रोजी सीआरपीएफच्या बुलेटप्रूफ बसचे उद्घाटन केले. अशा प्रकारची २०० वाहने संरक्षण मंत्रालयाकडे असताना ती वाहने अद्याप जवानांना का दिली गेली नाहीत? या बसेस कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. या सरकारला बालाकोट एअरस्ट्राईकचे श्रेय घ्यायचे असेल, तर जवानांना सुरक्षा पुरवण्यात कमी पडल्याची जबाबदारीही घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. यंदा निवडणुकीच्या मैदानात एकट्याने उतरणे टीडीपीला महागात पडेल का, या प्रश्नाच्या उत्तरात दिनकर लंका म्हणाले की, उलट याचा आम्हाला फायदा होईल. २००४ मध्ये भाजप बरोबर असल्याने आम्हाला अल्पसंख्यकांची मते गमवावी लागली होती. मात्र यंदा स्वतंत्र लढत असल्याने आमच्या मतात निश्चितच वाढ होईल, असेही ते म्हणाले.किंगमेकरच्या भूमिकेसाठी तयारीतेलगू देसम पार्टीला आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २० जागा मिळतील व आम्ही केंद्रात महत्त्वाची भूमिका बजावू, असा दावाही लंका यांनी केला. टीडीपीने २०१४च्या लोकसभा निवडणुकीत १५ जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी या पक्षाबरोबर भाजप व अभिनय क्षेत्रातून राजकारणात उतरलेले पवन कल्याण हेही होते. केंद्रात किंगमेकरची भूमिका बजावण्याच्या तयारीत असलेले टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू विरोधी पक्षांना एकत्रित करीत असून, संपूर्ण देशाचा दौरा करीत आहेत.

टॅग्स :Telugu Desam Partyतेलगू देसम पार्टीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडू