शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

४०० पार बहुमत मिळाल्यास संविधानात बदल करू; भाजपा खासदाराच्या विधानानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 12:05 IST

संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असं त्यांनी सांगितले. 

कर्नाटक - Ananth Kumar Hegde's remarks on the Constitution ( Marathi News ) अबकी बार ४०० पार...बहुमत आल्यास संविधानात बदल करू. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द हटवण्यासाठी भाजपा यात दुरुस्ती करेल. त्यासाठी लोकसभेत भाजपा दोन तृतीयांश बहुमत द्या. जेणेकरून देशातील संविधानात बदल करता येऊ शकतो असं वादग्रस्त विधान भाजपाचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी केले आहे. सहा वर्षापूर्वीही अशाचप्रकारे ते बोलले होते. 

हेगडे हे कर्नाटकातून सहा वेळा लोकसभा सदस्य राहिले आहेत. एका रॅलीत अनंत कुमार हेगडे म्हणाले की, काँग्रेसने संविधानात अनावश्यक गोष्टी जबरदस्तीने टाकल्या आहेत. विशेष म्हणजे असे कायदे ज्यातून हिंदू समाजाला दाबण्यासाठी केलेत. हे सर्व बदलायचे आहे. ते बहुमताशिवाय शक्य नाही. आता लोकसभेत काँग्रेस नाही आणि पंतप्रधान मोदींकडे दोन तृतीयांश बहुमत आहे तरीही हे शक्य नाही. कारण संविधानात बदलासाठी लोकसभा, राज्यसभा दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमतासह दोन तृतीयांश राज्यातही विजय आवश्यक असतो असं त्यांनी सांगितले. 

तसेच मोदी यांनी अबकी बार ४०० पार घोषणा दिलीय, ती ४०० पार का? कारण लोकसभेत आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. परंतु राज्यसभेत आमच्याकडे बहुमत नाही. राज्य सरकारमध्येही आमच्याकडे आवश्यक बहुमत नाही. जर आगामी लोकसभा निवडणुकीत ४०० जागाहून अधिक जागा मिळाल्या तर राज्यसभेतही बहुमत मिळवण्यासाठी मदत होईल असं खासदार अनंत कुमार हेगडे यांनी म्हटलं. 

राहुल गांधींचा निशाणा

भाजपाला ४०० जागा संविधान बदल करण्यासाठी हव्यात. नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराचा छुपा अजेंडा आता सार्वजनिक झालाय. मोदी आणि भाजपाला बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवायचे आहे. त्यांना न्याय, समानता, नागरी हक्क आणि स्वातंत्र्य यांच्याशी द्वेष आहे. समाजाचं विभाजन करणे, मीडियाला गुलाम बनवणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे, तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव आणणं, यातून भारताच्या लोकशाहीला हुकुमशाहीत बदलण्याचं त्यांचं धोरण आहे अशा शब्दात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

भाजपाचं स्पष्टीकरण

विरोधकांच्या टीकेनंतर भाजपाने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. कर्नाटक भाजपाने याबाबत ट्विट करून अनंत कुमार हेगडे यांच्या विधानापासून फारकत घेतली आहे. हेगडे यांचं हे वैयक्तिक मत आहे. त्यांच्याकडून पक्षाने स्पष्टीकरण मागवलं आहे. भाजपाने नेहमी संविधानिक लोकहित आणि राष्ट्रीय हितासाठी काम केले आहे असं भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी सांगितले. 

टॅग्स :BJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी