"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 18:53 IST2025-10-26T18:43:40+5:302025-10-26T18:53:43+5:30

बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. तेजस्वी यादव यांनी आज एका सभेत मोठे आश्वासन दिले.

"If we come to power, we will throw the Waqf Act in the dustbin Tejashwi Yadav assures in a public meeting | "सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन

"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन

बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.  प्रचारसभा सुरू आहेत. आज एका सभेवेळी राजद नेते तेजस्वी यादव यांनी रविवारी एक मोठे राजकीय विधान केले. 'जर अखिल भारतीय आघाडीने बिहारमध्ये सरकार स्थापन केले तर केंद्र सरकारने मंजूर केलेला वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून दिला जाईल. कटिहार आणि किशनगंज या मुस्लिमबहुल भागात जाहीर सभांना संबोधित करताना तेजस्वी यादव यांनी हे विधान केले.

"माझे वडील लालू प्रसाद यादव यांनी कधीही जातीय शक्तींशी तडजोड केली नाही. परंतु नितीश कुमार नेहमीच अशा शक्तींसोबत राहिले आहेत. त्यांच्यामुळेच आरएसएस आणि त्यांच्या संघटना द्वेष पसरवत आहेत. भाजपला भारत जलाओ पार्टी म्हटले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.

नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा

एप्रिलमध्ये केंद्र सरकारने वक्फ कायदा, २०२४ मंजूर केला आहे. दरम्यान, आता तेजस्वी यादव यांचे हे विधान आले आहे. एनडीए सरकारने हा मुस्लिम समुदाय, मागासवर्गीय आणि महिलांना सक्षम करणारा पारदर्शक कायदा असल्याचे वर्णन केले. हा कायदा मुस्लिमांच्या धार्मिक आणि मालमत्ता अधिकारांचे उल्लंघन करतो,असा विरोधी पक्षांचा युक्तिवाद आहे.

राजदचे एमएलसी मोहम्मद कारी सोहेब यांनीही तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाले तर वक्फ विधेयकासह सर्व विधेयके फाडून फेकून दिली जातील असे विधान केले होते. यानंतर, भाजपने प्रश्न उपस्थित केले होते.मुख्यमंत्री केंद्रीय कायदा कसा रद्द करू शकतात?, असा सवाल भाजपाने केला.

संविधान आणि लोकशाहीची लढाई

"ही निवडणूक संविधान, लोकशाही आणि बंधुत्वाच्या रक्षणासाठीची लढाई आहे. लोक गेल्या २० वर्षांपासून नितीश कुमारांना कंटाळले आहेत. सरकारच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार बोकाळला आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांच्या दीर्घ कारकिर्दीनंतरही बिहार हे देशातील सर्वात गरीब आणि मागासलेले राज्य आहे, असा आरोप केला.

Web Title : तेजस्वी यादव का वादा: बिहार में जीते तो वक्फ कानून रद्द करेंगे।

Web Summary : राजद नेता तेजस्वी यादव ने बिहार चुनाव जीतने पर वक्फ कानून रद्द करने का वादा किया। उन्होंने नीतीश कुमार पर विभाजनकारी ताकतों से हाथ मिलाने का आरोप लगाया और कहा कि बीजेपी ने नफरत फैलाई है और लंबे शासन के बावजूद बिहार की स्थिति सुधारने में विफल रही है।

Web Title : Tejashwi Yadav vows to scrap Waqf Act if elected in Bihar.

Web Summary : RJD leader Tejashwi Yadav promised to discard the Waqf Act if his alliance wins the Bihar election. He criticized Nitish Kumar for aligning with divisive forces, accusing the BJP of spreading hatred and failing to improve Bihar's condition despite long rule.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.