शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:03 IST

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय काय आयात करतो भारत?

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही देशांतील वाढत्या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. एवढेच नाही तर, इस्रायलच्याइराणवरील हल्ल्याचा शेअर बाजारावरही वाईट परिणाम झाला आहे आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहा झाले आहेत. हे युद्ध आणखी वाढण्याची आणि लांबण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील देशांचे टेन्शन वाढले आहे. 

इराण आणि इस्रायल युद्ध लांबल्यास पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल. यामुळे अनेक वस्तूंच्या अथवा गोष्टींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया, अशा परिस्थितीत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा आणि इस्रायल-इराण यांच्यातील युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? भारत या दोन्ही देशांकडून कोण कोणत्या गोष्टींची आयात करतो आणि कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढू शकता? इस्रायलकडून कोण कोणत्या वस्तू आयात करतो भारत? -भारत आणि इस्रायल यांच्यात दीर्घकाळापासून चांगले व्यापारी संबंध आहेत. आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इस्रायलला २.१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या आहेत. तर १.६ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत संरक्षण क्षेत्राशी संबंधित बहुतेक वस्तू इस्रायलकडून आयात करतो. महत्वाचे म्हणजे, इस्रायल हा भारताचा ३२ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत इस्रायलकडून रडार, सर्व्हिलांन्स, लढाऊ ड्रोन, क्षेपणास्त्रे यांसह लष्करी हार्डवेअर आयात करतो. याशिवाय मोती, मौल्यवान दगड, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खते, रासायनिक उत्पादने देखील आयात केली जातात.

इराणकडून काय काय आयात करतो भारत? -आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इराणला १.२ अब्ज डॉलर्सची निर्यात केली असून ४४१.९ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत इराणमधून कच्चे तेल, सुका मेवा, केमिकल्स, काचेची भांडी आयात करतो. याशिवाय, बासमती तांदूळ, चहा, कॉफी आणि साखर निर्यात केली जाते.या वस्तूंच्या किंमती वाढणार -तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते, यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीच प्रभावित होईल. परिणामी आयात-निर्यात महाग होईल. याशिवाय, विमान भाडे देखील वाढू शकते. खरे तर, पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने, भारतीय विमान कंपन्या आखाती देशांकडून प्रवास करतात. युद्धादरम्यान, या विमान कंपन्यांना दुसरा मार्गही शोधावा लागेल.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत