शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 19:03 IST

इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय काय आयात करतो भारत?

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू झालेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. या दोन्ही देशांतील वाढत्या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. एवढेच नाही तर, इस्रायलच्याइराणवरील हल्ल्याचा शेअर बाजारावरही वाईट परिणाम झाला आहे आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये स्वाहा झाले आहेत. हे युद्ध आणखी वाढण्याची आणि लांबण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील देशांचे टेन्शन वाढले आहे. 

इराण आणि इस्रायल युद्ध लांबल्यास पुरवठा साखळीवर मोठा परिणाम होईल. यामुळे अनेक वस्तूंच्या अथवा गोष्टींच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तर जाणून घेऊया, अशा परिस्थितीत मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा आणि इस्रायल-इराण यांच्यातील युद्धाचा भारतावर काय परिणाम होईल? भारत या दोन्ही देशांकडून कोण कोणत्या गोष्टींची आयात करतो आणि कोणत्या गोष्टींच्या किंमती वाढू शकता? इस्रायलकडून कोण कोणत्या वस्तू आयात करतो भारत? -भारत आणि इस्रायल यांच्यात दीर्घकाळापासून चांगले व्यापारी संबंध आहेत. आकडेवारीसंदर्भात बोलायचे झाल्यास, २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इस्रायलला २.१ अब्ज डॉलर्सच्या वस्तू निर्यात केल्या आहेत. तर १.६ अब्ज डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत संरक्षण क्षेत्राशी संबंधित बहुतेक वस्तू इस्रायलकडून आयात करतो. महत्वाचे म्हणजे, इस्रायल हा भारताचा ३२ वा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. भारत इस्रायलकडून रडार, सर्व्हिलांन्स, लढाऊ ड्रोन, क्षेपणास्त्रे यांसह लष्करी हार्डवेअर आयात करतो. याशिवाय मोती, मौल्यवान दगड, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, खते, रासायनिक उत्पादने देखील आयात केली जातात.

इराणकडून काय काय आयात करतो भारत? -आर्थिक वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात भारताने इराणला १.२ अब्ज डॉलर्सची निर्यात केली असून ४४१.९ दशलक्ष डॉलर्सच्या वस्तू आयात केल्या आहेत. भारत इराणमधून कच्चे तेल, सुका मेवा, केमिकल्स, काचेची भांडी आयात करतो. याशिवाय, बासमती तांदूळ, चहा, कॉफी आणि साखर निर्यात केली जाते.या वस्तूंच्या किंमती वाढणार -तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते, यामुळे संपूर्ण पुरवठा साखळीच प्रभावित होईल. परिणामी आयात-निर्यात महाग होईल. याशिवाय, विमान भाडे देखील वाढू शकते. खरे तर, पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद झाल्याने, भारतीय विमान कंपन्या आखाती देशांकडून प्रवास करतात. युद्धादरम्यान, या विमान कंपन्यांना दुसरा मार्गही शोधावा लागेल.

टॅग्स :Israelइस्रायलIranइराणwarयुद्धIndiaभारत