शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

INDIA आघाडीत घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे उरणार काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 10:36 IST

इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस पक्ष त्याग करण्यासाठी तयार झाली आणि सर्व घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे काय राहणार? हा मुद्दा आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यात सत्ताधारी एनडीए आघाडी भाजपाच्या नेतृत्वात अनेक जागांवर उमेदवारांची घोषणा करण्याची तयारीत आहे. तर विरोधी इंडिया आघाडीत अद्याप जागावाटपावरून तिढा सुटलेला नाही. इंडिया आघाडीत राज्यांपासून दिल्लीपर्यंत जागावाटपावर चर्चा सुरू आहे. दररोज बैठका घेतल्या जात आहेत. नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. परंतु यूपी आणि बिहारपासून पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, दिल्ली आणि पंजाबपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल? याचे उत्तर अद्याप मिळाले नाही. 

विविध राज्यात वेगवेगळ्या पक्षांचा आपापला फॉर्म्युला आहे. प्रत्येकाच्या मागण्या आहेत. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडी असेल अथवा नितीश कुमारांचा जेडीयू पक्ष, दोघेही जागावाटपात तडजोड करायला तयार नाहीत. यूपीत समाजवादी पार्टीच्या अखिलेश यादव यांनीही जागांची संख्या ठाम सांगितली आहे. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटही २३ जागांसाठी आग्रही आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असणाऱ्या आप पक्षाने गोवा, गुजरात आणि हरियाणात काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू केलीत. 

इंडिया आघाडीत जागावाटपाबाबत रस्सीखेच सुरु असताना काँग्रेस पक्ष त्याग करण्यासाठी तयार झाली आणि सर्व घटक पक्षांच्या मागण्या पूर्ण केल्या तर काँग्रेसकडे काय राहणार? हा मुद्दा आहे. यूपीत इंडिया आघाडीचे नेतृत्व समाजवादी पार्टी करेल असं अखिलेश यादवनं स्पष्ट केलंय. एकीकडे सपाने काँग्रेससोबत बोलणी सुरू केलीत तर दुसरीकडे ६५ जागांवर लढण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेस आणि सपा यांच्यात आघाडी झाली तर १५ लोकसभा जागांसाठी जयंत चौधरी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोक दललाही सोबत घ्यावे लागेल. जयंत चौधरी ६ जागांची मागणी करत आहेत. अशावेळी काँग्रेसला यूपीच्या ८० जागांपैकी केवळ ९ जागा शिल्लक राहतात. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गट २३ जागांची मागणी करत आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपासोबत मैदानात उतरून शिवसेनेने २३ उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ जागांवर विजय मिळाला. परंतु तेव्हा पक्ष मजबूत होता. त्यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ४ जागांवर विजय मिळाला होता. २०१९ मध्ये ज्या जागांवर ठाकरे गटाने उमेदवार उभे केले होते त्या जागा पुन्हा लढवण्यासाठी ते आग्रही आहेत. राष्ट्रवादीनेही १२ जागांची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीनेही ४ जागांची मागणी केली आहे. राज्यात एकूण ४८ जागा असून काँग्रेसला सोडलं तर जवळपास ४० जागा घटक पक्ष मागत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेस