शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

मोदींना मिठी मारता येते मग केजरीवालांना फोन का नाही? आपचा राहुल गांधींना प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 1:43 PM

अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेमुळे भारतीय जनता पार्टीला मदतच झाली आहे.

नवी दिल्ली- राज्यसभेत उपाध्यक्षांच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकार एक परिक्षाच पास झाले आहे असे म्हणावे लागेल. या निवडणुकीत विरोधकांच्या होणाऱ्या एकजुटीमध्ये मात्र काही त्रूटी असल्याचे दिसून आले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फोन केला नाही म्हणून आम आदमी पार्टीच्या सदस्यांनी अनुपस्थित राहाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सरकारला ही निवडणूक आणखी सोपी गेली.  राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठी मारु शकतात तर आमच्या पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना (मतदान करण्याची विनंती करणारा) फोन का करु शकत नाहीत?असा प्रश्न आपचे खासदार संजय सिंग यांनी विचारला आहे. आपला उमेदवार जिंकावा यासाठी नितिशकुमार प्रयत्न करतात तर काँग्रेसच्या उमेदवारासाठी राहुल का प्रयत्न करत नाहीत? आम्ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीच्यावेळेस काँग्रेसची मदत केली मात्र साधे आभारही मानले गेले नाहीत अशी खंत संजय सिंग यांनी व्यक्त केली आहे.

 2014 साली केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आल्यापासून राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे भारतीय जनता पार्टीला अनेकदा नामुष्कीजनक ठरावांना, दुरुस्त्यांना सामोरे जावे लागले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या ठरावातही विरोधकांनी मांडलेल्या दुरुस्त्यांना केवळ बहुमत नसल्यामुळे मान्य करावे लागले.  आता मात्र ही परिस्थिती बदलत आहे असे दिसून येते. राज्यसभेत भाजपाचे संख्याबळ वाढले असले तरी अनेक महत्त्वाच्या निर्णयांबाबतीत, ठरावांसाठी मित्रपक्षांना आणि कधीकधी विरोधकांनाही विनंती करावी लागते. उपाध्यक्षपदाची निवड एकमताने होण्याची चिन्हे मावळल्यावर भारतीय जनता पार्टीला मित्रपक्षांमधील उमेदवार शोधणे भाग पडले. बिजू जनता दलाला आपल्या गटात ओढण्यासाठी त्यांच्या सदस्यांपैकीही चाचपणी करुन झाली. तसेच अकाली दलाच्या गुजराल यांचे नाव पुढे करुनही त्यावर चर्चा करण्यात आली. शेवटी आता मित्रपक्षांमध्ये संबंध सर्वात जास्त ताणल्या गेलेल्या जनता दल युनायटेडच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.जदयु उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी विनंती करणारा फोन पंतप्रधान मोदी यांनी बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनाईक यांना केला तर शेवटच्या दोन दिवसांमध्ये अकाली दल व शिवसेना यांचाही पाठिंबा त्यांनी मिळवला. सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना या मतदानामध्ये भाग घेणार नाही अशीही चर्चा होती.244 खासदारांच्या राज्यसभेत बहुमताचा आकडा 123 होता. मात्र सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे तो 119 वरती आला. केजरीवालांच्या आपसब वायएसआर काँग्रेस, मेहबूबा मुफ्ती यांचा पीडीपी पक्षाचे सदस्यही उपस्थित राहिले नाहीत.विरोधकांच्या गोटामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, डावे पक्ष, सनाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, तेलगू देसम पक्ष यांचा समावेश होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAam Admi partyआम आदमी पार्टीRajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेस