शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:20 IST

१९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी नागपूरला आल्या. पत्रकारांना म्हणाल्या होत्या.. ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’. ३९ वर्षांपूर्वी इंदिराजींनी नागपुरात दिलेला हाच मंत्र काँग्रेसला आज उपयोगी पडणारा आहे.

- मधुकर भावे

(ज्येष्ठ पत्रकार)१९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी नागपूरला आल्या. पत्रकारांना म्हणाल्या होत्या.. ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’.३९ वर्षांपूर्वी इंदिराजींनी नागपुरात दिलेला हाच मंत्र काँग्रेसला आज उपयोगी पडणारा आहे.इंदिरा गांधी यांचा वयाच्या चौथ्या वर्षापासून ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी रक्त सांडेपर्यंत देशाशी संबंध होता. त्यांनी काँग्रेससाठी वानरसेना स्थापन केली ती १२ व्या वर्षी. त्यामुळे काँग्रेसच्या १३२ वर्षांच्या इतिहासात इंदिराजींचे स्थान अनन्यसाधारण आहे. जन्मशताब्दी वर्षात काँग्रेसने देशात व राज्यात जन्मशताब्दी वर्ष ज्या तडफेने साजरे करायला हवे होते तसे केले नाही.काँग्रेसचा, इंदिराजींचा व संजय गांधींचा १९७७ साली पराभव झाला. पण इंदिराजी रस्त्यावर उतरल्या. नागपूरला आल्या. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या घरीच त्या थांबल्या. तेथूनच त्या पवनारला विनोबा भावे यांना भेटायला गेल्या. तिथे पत्रकारांनी घेरून, पराभवाबद्दल विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’...इंदिराजींच्या त्या वाक्यानंतर १९८० च्या निवडणुकीत जनता पक्षाचा धुव्वा उडाला व इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या. या घटनेचा संदर्भ दोन कारणांनी देतो. ज्या ‘लोकमत’ने इंदिराजी जन्मशताब्दीनिमित्त या अंकाचे आयोजन केले आहे त्या लोकमतचा काँग्रेस सत्तेवर पुन्हा येण्यात मोठा सहभाग होता. १० जानेवारी १९७८ रोजी शिवाजी पार्कवरील सभेत त्या म्हणाल्या, ‘विदर्भ मे मैं लोकमत के हथियार से मै लड रहीं हू’. नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर २३ जानेवारी १९७८ रोजी सभेत इंदिराजींनी ‘फिर जीत जाऐंगे’, असा दावा केला होता.काँग्रेसला ३७ वर्षांनंतर हाच मंत्र उपयोगी पडेल. कस्तुरचंद पार्कच्या सभेत त्या म्हणाल्या की, गरिबांचा आवाज दडपला गेला म्हणून मी रस्त्यावर उतरले. आज तर गरिबांनाच दडपणे सुरू आहे. १९८० च्या निवडणुकांत काँग्रेसच्या भूमिका ठरवायला इंदिराजींनी जवाहरलाल दर्डा यांना बोलावले. त्यांच्यासोबत जाण्याची संधी मला मिळाली. इंदिराजींची मुलाखत झाली. त्यानंतर जनता राजवटीच्या विरोधात एक पोस्टर सर्व भाषेत प्रसिद्ध झाले. ते पोस्टर लोकमतने तयार केले होते. इंदिराजींच्या १९८० च्या यशात लोकमतचे असे योगदान होते. आज नेमकी तीच स्थिती आहे. काँग्रेसला पुरोगामी विचार घेऊन एक मोठी लढाई लढावी लागेल. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची मोठी घसरण झाली. पण देशाच्या उभारणीत काँगे्रस आणि इंदिराजी यांचा मोठा वाटा आहे.- ५० वर्षांत काँग्रेसने काय केले असे विचारले जाते. या देशाला एक ठेवण्याचे काम काँग्रेसनेच केलेले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची बलिदाने वाया जाणार नाहीत. यासाठी इंदिराजींची जिद्द, हिंमत काँग्रेसला पुन्हा एकदा यशाकडे घेऊन जाऊ शकेल.तोच मंत्र आताही तारेल१९८४ मध्ये लोकसभेच्या ४१५ जागा जिंकण्याचा विक्रम करणाºया काँग्रेसला २०१४ साली ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेसला राखेतून उभं राहावं लागेल. देशात आणि महाराष्टÑातही. हे फार अशक्य नाही. इंदिराजींनी चमत्कार करून दाखवला. आता लोक चमत्कार करतील. जातीयवाद व धर्मवादाच्या उदात्तीकरणा- विरोधात उभं राहावं लागेल. १९७७ साली लढाई हरलेल्या काँग्रेसने १९८० साली लढाई जिंकली होती. ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’ हा इंदिराजींचा मंत्रच काँग्रेसला तारेल.

टॅग्स :Indira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष