शहरं
Join us  
Trending Stories
1
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
2
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
3
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
4
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
5
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
6
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
7
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
8
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
9
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
10
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

...तर १९६२च्या युद्धात मानहानी पत्करावी लागली नसती, अरुणाचलचे राज्यपाल मिश्रा यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 8:04 AM

अरुणाचलातील छांगलांग जिल्ह्यात आयोजित केलेल्या सैनिक संमेलनात लष्कराच्या राजपूत रेजिमेंटला संबोधित करताना राज्यपाल मिश्रा यांनी लष्कराच्या सद्यस्थितीवर भाष्य केले.

इटानगर : चिनी सैन्याने अरुणाचलनजीक सीमारेषेवर संपूर्ण गाव वसवले असल्याने भारत आणि चीन संबंध ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना लष्कराने कोणत्याही स्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहावे, असे आवाहन अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर (निवृत्त) बी. डी. मिश्रा यांनी केले आहे. तसेच देशाचे नेतृत्व सक्षम असते तर १९६२च्या चीनविरुद्धच्या युद्धात भारताला मानहानी पत्करावी लागली नसती, असेही मिश्रा म्हणाले.  अरुणाचलातील छांगलांग जिल्ह्यात आयोजित केलेल्या सैनिक संमेलनात लष्कराच्या राजपूत रेजिमेंटला संबोधित करताना राज्यपाल मिश्रा यांनी लष्कराच्या सद्यस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, १९६२ मध्ये देशाचेते तत्कालीन नेतृत्व सक्षम असते तर चीनविरुद्धच्या युद्धात भारताला मानहानी पत्करावी लागली नसती. आता मात्र चित्र पालटले आहे. भारतही शस्त्रसज्ज असून आव्हानाचा मुकाबला करू शकतो. मात्र, असे असले तरी आपण गाफील राहून चालणार नाही. सीमेवरील कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी प्रत्येक सैनिकाने तत्पर राहणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना त्यांच्या नेतृत्वाखाली लष्करात अनेक बदल झाले असल्याचे मिश्रा यांनी नमूद केले.  

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndiaभारतchinaचीन