शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

काँग्रेसच्या जागांनी शंभरी पार न केल्यास राहुल यांच्या नेतृत्व पुन्हा प्रश्नचिन्ह?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 3:49 PM

गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला अपेक्षित जागा मिळताना दिसत नाही. अशा परिस्थितीत जर काँग्रेसला प्रत्यक्ष निकालात 100 जागा मिळाल्या नाही तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जाऊ शकतो. मागील लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद मिळवितानाही काँग्रेसला अडचण निर्माण झाली होती. फक्त 44 जागांवर काँग्रेसला समाधान मानावं लागलं होतं. 

गेल्या दिड वर्षापासून काँग्रेस नेतृत्वाची धूरा राहुल गांधी यांच्या हातात आहे. मागील 5 राज्यातील निवडणुकांनतर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मिळालेलं यश वाखणण्याजोगे होते. त्यानंतर झालेल्या या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. निवडणुकपूर्व केलेल्या सर्व्हेक्षणामधून काँग्रेसला सहजासहजी केंद्रात सत्ता मिळविता येणार नाही. त्यामुळे 100 जागांचा आकडा पार करणे काँग्रेससाठी गरजेचे आहे अन्यथा राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. मागील 5 वर्ष काँग्रेसने अनेक निवडणुकीत पराभवाचा सामना केला आहे. पण छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुधारली.या राज्यात सत्ता स्थापन करण्यात काँग्रेसला यश आलं. काँग्रेसच्या यशाचा हा आलेख यंदाच्या निवडणुकीत राखणं काँग्रेससाठी आव्हान बनलं होतं. 

दरम्यान काँग्रेसची यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी राहील. राहुल गांधी यांनी सामान्य गरिबांचा आवाज बुलंद केला आहे. राहुल गांधी यांची मेहनत आणि प्रयत्न या निवडणुकीत दिसलं आहे. त्याचे परिणाम निश्चित निकालात दिसतील असा विश्वास काँग्रेसचे नेते व्यक्त करत आहेत.     

17व्या लोकसभेसाठी गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा रविवारी शांत झाला. सातव्या टप्प्यात 19 मे रोजी 59 जागांवर मतदान झालं असून, तत्पूर्वीच देशात कोणाचं सरकार येणार? यूपीए की एनडीए कोण बाजी मारणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. सरकार कोणाचं बनणार आणि देशाचा पुढचा पंतप्रधान कोण होणार याचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस