शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
5
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
8
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
9
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
10
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
11
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
12
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
13
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
14
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
15
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
16
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
17
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
18
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
19
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
20
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस सत्तेत आली तर 370 वर पुनर्विचार करू, पाकिस्तानी पत्रकाराशी दिग्विजय यांची चर्चा; भाजपचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2021 12:54 IST

केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे.

नवी दिल्ली - भजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह (Digvijay singh) यांची एक ऑडिओ क्लिप जारी केली आहे. हा ऑडिओ क्लबहाउस चॅटचा आहे. यात दिग्विजय सिंह आर्टिकल-370 संदर्भात बोलत आहेत. या ऑडिओमध्ये, जर काँग्रेस सत्तेत आली तर आर्टिकल 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल, असे दिग्विजय सिंह बोलताना असल्याचे ऐकू येत आहे. (If Congress comes to power reconsider 370, Digvijay singh's discussion with Pakistani journalist, BJP's claim)

केंद्रातील भाजप सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविले आहे. तसेच, जम्मू-काश्मीर आणि लडाखचे दोन केंद्र शासित प्रदेशांत विभाजनही केले आहे.

अमित मालवीय ( Amit Malviya) यांनी दावा केला आहे, की या चॅटमध्ये पाकिस्तानी पत्रकारही होते. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, "क्लबहाउस चॅटमध्ये राहुल गांधींच्या जवळचे नेते दिग्विजय सिंह पाकिस्तानी पत्रकाराला बोलत आहेत, जर काँग्रेस सत्तेत आली, तर आर्टिकल 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल. खरच? हीच तर पाकिस्तानची इच्छा आहे..."

" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

नेमकं काय बोलतायत दिग्विजय सिंह? ऑडिओमध्ये काय ऐकायला येतंय? -या चॅटमध्ये दिग्विजय सिंह बोलताना ऐकू येत आहे, की "त्यांनी जेव्हा काश्मीरचे आर्टिकल 370 हटविले, तेव्हा तेथे लोकशाही नव्हती. तेथे मानवताही नव्हती, कारण सर्वांनाच कारागृहात डांबण्यात आले होते. काश्मिरियत्व तेथील धर्मनिरपेक्षतेचा भाग आहे. कारण मुस्लीम बहूल राज्याचा राजा हिंदू होता आणि दोघेही सोबतीने काम करत होते. एवढेच नाही, तर काश्मिरात कश्मिरी पंडितांना सरकारी नौकरीत आरक्षणही देण्यात आले होते. अशात आर्टिकल 370 हटविण्याचा निर्णय अत्यंत वाईट होता आणि जेव्हा काँग्रेस सत्तेत येईल तेव्हा 370 हटविण्याच्या निर्णयावर पुन्हा विचार केला जाईल."

दिग्विजय यांच्या ऑडिओनंतर भाजप आक्रमक - दिग्विजय यांची ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर भाजप आक्रमक झाला आहे. बेगूसरायमधील भाजपचे खासदार तथा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी ट्विट करत काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले आहे, "पाकिस्तान हे काँग्रेसचे पहिले प्रेम आहे. दिग्विजय सिंह यांनी राहुल गांधींचाच मेसेज पाकिस्तानपर्यंत पोहोचवला आहे. काश्मीर बळकावण्यात काँग्रेस पाकिस्तानची मदत करेल.

टॅग्स :Article 370कलम 370Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर