" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

By बाळकृष्ण परब | Published: October 17, 2020 01:15 PM2020-10-17T13:15:13+5:302020-10-17T13:19:34+5:30

Article 370 News : ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे.

"Congress and its allies will have to birth 370 time to re-enact Article 370 in Jammu and Kashmir" - Mukhtar Abbas Naqvi | " जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

" जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील"

googlenewsNext
ठळक मुद्देकलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग झाला मोकळा कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल

नवी दिल्ली - माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी काल कलम ३७० बाबत केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. कलम ३७० हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी करणाऱ्या पी. चिदंबरम यांच्यावर भाजपाचे नेते मुख्यात अब्बास नक्वी यांनी जोरदार टीका केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील, असा टोला मुख्यार अब्बास नक्वी यांनी लगावला आहे.

पी. चिदंबरम यांनी कलम ३७० बाबत केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यासाठी काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ३७० जन्म घ्यावे लागतील. कलम ३७० रद्द झाल्याने जम्मू-काश्मीर, लेह, कारगिलमधील ३७० समस्या सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेमध्ये सकारात्मक वातावरण आहे. मत्र असे असतानाही काँग्रेस आणि त्यांचे बगलबच्चे असलेल्या मित्रांना कलम ३७० पुन्हा लागू करता येईल, असे वाटत असेल. तर ते मुंगेरीलालचे स्वप्न ठरेल, असा चिमटाही नक्वी यांनी काढला.

जम्म-काश्मीरमधील मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांनी गुरुवारी एका बैठकीचे आयोजन करत जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली होती. तसेच या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी काश्मिरी पक्षांनी एका आघाडीची घोषणा केली आहे. ही आघाडी कलम ३७० च्या मागणीसांठी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा सुरू करणार असल्याचे म्हटले होते. यासाठीची बैठक नॅशनल कॉन्फ्रन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीला पीडीपीच्या अध्यक्षा महेबुबा मुफ्ती, पीपल्स कॉन्फ्रन्सचे सज्जाद लोन, पीपल्स मुव्हमेंटचे नेते जावेद मीर आणि माकपाचे नेते मोहम्मद युसूप तारिगामी हे उपस्थित होते. दरम्यान, या आघाडीला पी. चिदंबरम यांना पाठिंबा देत कलम ३७० रद्द करण्याची मागणी केली होती.

कलम ३७०बाबत काय म्हणाले होते पी. चिदंबरम

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्यात यावे, असे विधान केले आहे. तसेच या मागणीसाठी काश्मिरी पक्षांनी केलेल्या आघाडीलाही पाठिंबा दिला आहे. पी. चिदंबरम यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय मागे घेतला पाहिजे. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांचे अधिकार परत मिळवण्यासाठी मुख्य प्रवाहातील पक्षांनी घटनात्मक लढाई लढण्यासाठी एकत्र येण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे देशातील नागरिकांनी स्वागत केले पाहिजे. केंद्र सरकारने मुख्य प्रवाहातील पक्ष आणि आणि जम्मू काश्मीरमधील जनतेकडे ते देशविरोधी असल्याच्या नजरेने पाहणे बंद केले पाहिजे. काँग्रेस जम्मू काश्मीरमील जनतेचे अधिकार परत मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ रोजी मनमानी पद्धतीने घेतलेला असंवैधानिक निर्णय मागे घेतला पाहिजे, असे चिदंबरम म्हणाले.

Web Title: "Congress and its allies will have to birth 370 time to re-enact Article 370 in Jammu and Kashmir" - Mukhtar Abbas Naqvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.