शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजपात असते!"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 14:23 IST

उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. लालजी निर्मल यांनी बाबासाहेबांवर भाष्य केलं आहे.

लखनऊ- उत्तर प्रदेशातील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाचे अध्यक्ष डॉ. लालजी निर्मल यांनी बाबासाहेबांवर भाष्य केलं आहे. जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज हयात असते, तर कदाचित ते भाजपामध्ये आले असते, असं डॉ. लालजी निर्मल म्हणाले आहेत. दलितांसाठी केंद्र आणि भाजपा सरकारनं केलेल्या कामाचा हवाला देताना त्यांनी हे विधान केलं आहे.तसेच त्यांनी बसपाच्या अध्यक्षा मायावतींवर टीकेची झोड उठवली आहे. बाबासाहेबांच्या संविधानाचा भंग करणं आणि त्याला कमकुवत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या मायावती असतील, असंही ते म्हणाले आहेत. काँग्रेस, सपा आणि बसपा हे जातीयवादी पक्ष आहेत. त्यामुळेच ते जातीचं राजकारण करतात. डॉ. निर्मल यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मायावतींवर टीका केली आहे.केंद्र सरकारनं आर्थिक वर्षात दलित समाजाच्या विकास योजनांसाठी जवळपास 138 कोटी रुपये दिले आहेत. उत्तर प्रदेशमधील अनुसूचित जाती आणि जमाती वित्त/विकास विभागाने 12, 280 कुटुंबांना 14.27 कोटी रुपयांची मदत केल्याचेही त्यांनी अधोरेखित केलं आहे. निर्मल यांनी आधीही अशी आक्षेपार्ह विधानं केली आहेत. मोदी व योगी हे दलितांचे राम असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. योगी आदित्यनाथ यांनीच त्यांच्यावर उत्तर प्रदेश अनुसूचित जाती आणि जमाती विकास मंडळाची जबाबदारी सोपवली आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरBJPभाजपा