शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

एमएसपीबद्दल भारतीयांना काय वाटतं?; मोदी सरकारची झोप उडवणारा सर्व्हे समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:22 PM

एमएसपी कायद्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच; आंदोलन स्थगित करण्यास शेतकऱ्यांचा नकार

नवी दिल्ली: गेल्याच आठवड्यात मोदी सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेतले. वर्षभरापासून शेतकरी आंदोलन करत असल्यानं सरकार कायदे रद्द करत असल्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केला. शेतकऱ्यांनी आपल्या घरी परतावं आणि नवी सुरुवात करावी असं आवाहन मोदींनी केलं. मात्र अद्याप शेतकरी माघारी परतलेले नाहीत. त्यांचं आंदोलन सुरूच आहे. एमएसपीचा मुद्दा निकाली निघेपर्यंत, त्यासंबंधी कायदा होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे.

एमएसपीबद्दल सर्वसामान्य लोकांना काय वाटतं, ते जाणून घेण्यासाठी आयएएनएस-सी व्होटरनं एक सर्व्हे केला. त्यातून समोर आलेली माहिती सरकारची झोप उडवणारी आहे. कायदेशीर पद्धतीनं निश्चित रकमेनं सर्व खाद्यान्न आणि उत्पादनं खरेदी करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करू पाहणाऱ्या सरकारच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

सरकार सर्व पिकांसाठी कायदेशीर पद्धतीनं एमएसपी देऊ शकतं, असं सर्व्हेत सहभागी झालेल्या ६२.६ टक्के लोकांना वाटतं. विरोधी पक्षातील अनेकांनीदेखील याबद्दल सहमती दर्शवली आहे. दूध, फळं, भाज्या, अंडी, चिकन आणि अन्य खाद्य पदार्थांना कायदेशीरपणे एमएसपी मिळावा या शेतकऱ्यांच्या मागणीशी किती जण सहमत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अशी मागणी झाल्यास आपला पाठिंबा असेल असं मत ७० टक्के लोकांनी व्यक्त केलं. एनडीएच्या ६३ टक्के समर्थकांनी यासाठी पाठिंबा दर्शवला.

कायदेशीरपणे हमीभाव देण्यासाठी सरकार संसाधनांची आणि आर्थिक जुळवाजुळव करत आहे. त्यासंदर्भात सर्व्हेक्षणात सहभागी झालेल्यांनी चिंता व्यक्त केली. सरकार सर्व पिकांना कायदेशीरपणे हमीभाव देऊ शकतं, असा सल्ला ६२.६ टक्के लोकांनी दिला. विशेष म्हणजे विरोधी पक्षाचं समर्थन करत असलेल्या लोकांनादेखील याबद्दल सहमती व्यक्त केली.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनNarendra Modiनरेंद्र मोदी