शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 12:29 IST

आगामी निवडणुकीनंतर सत्तांतर होईल; पवारांचं भाकीत

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात सत्तांतर होईल आणि पुढील पंतप्रधान ठरवण्यात माझी भूमिका महत्त्वाची असेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे. निवडणूक निकालाच्या आधारावर सर्व पक्ष एकत्र येऊन एक किमान समान कार्यक्रम तयार करतील आणि नवं सरकार स्थापन होईल, असंही पवार म्हणाले. ते आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या 'मुंबई मंथन' कार्यक्रमात बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही, असा दावा शरद पवारांनी केला. 'देशातील जनतेला परिवर्तन हवं आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीनंतर देशात आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं. मोदी त्यांच्या पक्षाचे सर्वात शक्तिशाली नेते आहेत. मात्र त्यांना देशाचे सामर्थ्यशाली नेते मानण्याची चूक करु नका,' असं शरद पवार म्हणाले. पुढील निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असं भाकितदेखील त्यांनी वर्तवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं व्यक्तीमत्त्व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखं नाही, याकडे पवारांनी लक्ष वेधलं. मोदी आणि वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्त्वात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्त्वाखाली आघाडी सरकार स्थापन होण्याचा प्रश्नच येत नाही, असं पवार म्हणाले. देशाचा पुढील पंतप्रधान ठरवण्यात आपली भूमिका महत्त्वाची असेल, असं सूचक विधान त्यांनी केलं. केवळ सत्तेसाठी सर्व विरोधक एकत्र येतात, या मोदींच्या टीकेलादेखील पवारांनी उत्तर दिलं. 2014 मध्ये मिळवलेला एकतर्फी विजय सोडल्यास त्याआधी भाजपानंदेखील कायम आघाडीच्या जोरावर सत्ता मिळवण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण पवारांनी करुन दिली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस