शहरं
Join us  
Trending Stories
1
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
2
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
3
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
4
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
5
त्रिभाषा धोरणाला राज्यभरात कसा प्रतिसाद? डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले, “पहिलीपासून हिंदी सक्ती...”
6
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
7
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
8
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
9
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
10
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
11
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
12
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
13
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
14
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
15
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
16
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट
17
Life Lesson: प्रत्येकाची वेळ येते, पण तयारी असावी लागते शेफाली वर्मासारखी आणि 'या' गोष्टीसारखी!
18
जामताडा बनण्याच्या मार्गावर 'हे' शहर; 615 सायबर ठगांना अटक, 100 कोटींची फसवणूक उघड
19
ICC Women's World Cup Winners : "विजयी विश्व तिरंगा प्यारा..." भारतीय 'रन'रागणींनी रचला इतिहास
20
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

"काँग्रेसचा एक नेता सोडून सर्वांना भाजपामध्ये आणणार", मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:01 IST

Assam chief minister Himanta Biswa Sarma : हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Assam chief minister Himanta Biswa Sarma :  नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकला तरी तो भाजपामध्ये जाईल, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे, कारण प्रत्येकाला भाजपामध्ये यायचे आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. आसाममधील करीमगंज जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेसचा कोणताही उमेदवार पक्षात राहू इच्छित नाही, प्रत्येकाला भाजपामध्ये सामील व्हायचे आहे. एक सोडून काँग्रेसमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना मी भाजपामध्ये आणणार आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. 

दरम्यान, हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करतील. राज्यातील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. अल्पसंख्याक आम्हाला मतदान करतील.

ईशान्येत भाजपा शानदार विजय नोंदवेल : मुख्यमंत्री सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील युती आगामी निवडणुकीत ईशान्येकडील लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले होते. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना हिमंता सरमा म्हणाले की, आसाममधील 14 जागांपैकी सध्या फक्त तीन जागा अनिश्चित आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस