शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

"काँग्रेसचा एक नेता सोडून सर्वांना भाजपामध्ये आणणार", मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:01 IST

Assam chief minister Himanta Biswa Sarma : हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

Assam chief minister Himanta Biswa Sarma :  नवी दिल्ली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसला मतदान करून फायदा नाही, कारण कोणी जिंकला तरी तो भाजपामध्ये जाईल, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे. 

काँग्रेसचे लोक काँग्रेसमध्ये राहतील की नाही, याबाबत शंका आहे, कारण प्रत्येकाला भाजपामध्ये यायचे आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. आसाममधील करीमगंज जिल्ह्यात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, काँग्रेसचा कोणताही उमेदवार पक्षात राहू इच्छित नाही, प्रत्येकाला भाजपामध्ये सामील व्हायचे आहे. एक सोडून काँग्रेसमध्ये विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना मी भाजपामध्ये आणणार आहे, असेही हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. 

दरम्यान, हा एक नेता कोण आहे? याबाबत हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्तेही पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान करतील. राज्यातील अल्पसंख्याकांच्या विकासासाठी आम्ही काम करत आहोत. अल्पसंख्याक आम्हाला मतदान करतील.

ईशान्येत भाजपा शानदार विजय नोंदवेल : मुख्यमंत्री सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील युती आगामी निवडणुकीत ईशान्येकडील लोकसभेच्या 25 पैकी 22 जागा जिंकेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी सांगितले होते. येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना हिमंता सरमा म्हणाले की, आसाममधील 14 जागांपैकी सध्या फक्त तीन जागा अनिश्चित आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस