शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

"मला फटकारलं गेलं...", भाजपकडून मिळालेल्या सल्ल्यावर कंगना यांनी मौन सोडलं; म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 17:52 IST

"...जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."

भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा खासदार तथा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री कंगना राणौत यांनी पक्षाकडून मिळालेल्या सल्ल्यावर मौन सोडले आहे. कंगना रणौत यांनी नुकतेच शेतकरी आंदोलनासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली उपद्रवी लोक हिंसाचार पसरवत होते. तसेच तेथे बलात्कार आणि हत्या होत होत्या, असे कंगना यांनी म्हटले होते. मात्र, त्यांच्या या विधानाशी भाजपने असहमती दर्शवत त्यापासून स्वतःला दूर ठेवले होते.

इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीत कंगना म्हणाल्या, "मला पक्ष नेतृत्वाने फटकारले आणि मला यात कोणतीही अडचण नाही. मी पक्षाचा शेवटचा आवाज आहे, असे मला वाटत नाही. असे मानायला मी एवढी वेडी अथवा मूर्खही नाही. मला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. मला वाटते, जर माझ्यामुळे खरोखरोच पक्षाच्या उद्देशाला पक्षाच्या स्थितीला अथवा धोरणाला धक्का लागला असेल तर माझ्यापेक्षा अधिक दुःख कुणालाही होऊ शकत नाही."

शेतकरी आंदोलनासंदर्भात काय म्हणाल्या होत्या कंगना? -भाजपच्या हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत एका मुलाखतीत बोलताना म्हणाल्या होत्या, "शेतकरी आंदोलनाच्या काळात काय घडले, हे ससर्वांनीच बघितले आहे. आंदोलनाच्या आडून हिंसा भडकावली गेली. तेथे बलात्कार होत होते. लोकांना मारून फासावर लटकावले जात होते. सरकारने जेव्हा तीन कृषि कायदे मागे घेतले, त्यावेळी सगळ्या उपद्रवी आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांचे नियोजन खूप दीर्घकाळाचे होते."

अशी होती भाजपची भूमिका -कंगना रणौत यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते हरजीत सिंह ग्रेवाल यांनी कंगना रणौतच्या विधानाशी भाजपचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, "शेतकऱ्यांबद्दल बोलणे हे कंगना यांचे काम नाही. कंगना यांचे हे वैयक्तिक विधान आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजप शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या बाजूने आहेत. कंगना रणौत यांनी अशी विधाने करू नये. असे बोलणे टाळायला हवे.", अशी भूमिका ग्रेवाल यांनी मांडली होती.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतBJPभाजपाFarmerशेतकरी