शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

सौगंध मुझे मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दुंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:24 IST

देश सुरक्षित हातांत आहे : पंतप्रधान मोदींची ग्वाही

चुरू (राजस्थान) :भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण देण्याचे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र बॉम्बहल्ल्यांनी उद््ध्वस्त केल्यानंतर, काही तासांतच येथे झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘देश सुरक्षित हातांत असल्याची’ आणि ‘भारतमातेचे मस्तक कधीही झुकू न देण्याची’ देशवासीयांना ग्वाही दिली.

पुलवामा हल्ल्यानंतर झालेल्या सर्व सभांमध्ये मोदींनी ‘प्रत्येक अश्रूचा बदला घेतला जाईल’ व ‘तुमच्या मनात संतापाची जी आग पेटली आहे, तीच माझ्याही मनात पेटली आहे,’ असे सांगून देशवासीयांच्या दुखऱ्या मनावर फुंकर घातली होती. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर झालेल्या या पहिल्यास सभेत नागरिकांच्या आनंदात पंतप्रधान मोदी हेही सामील झाले.

सभेच्या व्यासपीठावर मागील पडद्यावर पुलवामा हल्ल्यातील सीआरपीएफच्या ४० शहीद जवानांची छायाचित्रे लावण्यात आली होती. मोदींनी पहाटे झालेल्या कारवाईचा थेट उल्लेख केला नाही, पण सभेला येतानाच लोकांना त्याची माहिती मिळाल्याने श्रोत्यांच्या चेहऱ्यावर आनंद व उत्साह स्पष्ट दिसत होता. तीच नस पकडून भाषणाच्या सुरुवातीसच श्रोत्यांना उद्देशून म्हणाले की, आज मला तुमच्या चित्तवृत्ती वेगळ्याच जाणवत आहेत. तुमचा उत्साह मी समजू शकतो. देशाच्या पराक्रमी वीरांना मान झुकवून वंदन करण्याचाच हा क्षण आहे. देशाची सेवा करणाºया, देश उभारणीसाठी परिश्रम घेणाºया प्रत्येकाला देशाचा प्रधानसेवक या नात्याने मी नमन करतो, असेही मोदी म्हणाले.

तत्पूर्वी मी ‘अन्य काही कामात’ व्यग्र असल्याने ‘गांधी शांतता’ पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी येण्यास उशीर झाला, असा हवाई दलाच्या हल्ल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी तेथील उपस्थितांसमोर दिलगिरी व्यक्त केली.

हवाई हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानी कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक घेतली. ती आटोपून मोदी राष्ट्रपती भवन येथील दरबार हॉलमध्ये होणाºया ‘गांधी शांतता’ पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी आले. ११ वाजता सुरू होणारा सोहळा त्यामुळे काहीसा उशिरा सुरू झाला. २०१५-२०१८ या कालावधीतील ‘गांधी शांतता’ पुरस्कार या वेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विजेत्यांना प्रदान करण्यात आले. सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन भारतीय संरक्षण दलाने केलेली मोठी कारवाई म्हणजे हा हवाई हल्ला आहे.२०१४च्या निवडणूक सभेतील कविता ऐकविलीहा देश सुरक्षित हातांत आहे, याची तुम्ही पक्की खात्री बाळगा, असे पंतप्रधान मोदींनी सांगताच, श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट व जयजयकार करून त्यास दुजोरा दिला. याच संदर्भात २०१४च्या निवडणूक प्रचारसभेत म्हटलेली हिंदी कविता पुन्हा म्हणून नरेंद्र मोदी यांनी भारत मातेचे मस्तक कधीही झकू देणार नाही, या वचनाचा पुनरुच्चार केला.

तेरा शीश नहीं झुकने दुंगासौगंध मुझे इस मिट्टी की,मै देश नहीं मिटने दुंगा,मै देश नहीं रुकने दुंगा,मै देश नहीं झुकने दुंगा.मेरा वचन है भारतमां कोतेरा शीश नहीं झुकने दुंगा,जाग रहा है देश मेरा,हर भारतवासी जितेगा.सौगंध मुझे मिट्टी की,मै देश नहीं झुकने दुंगा

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकNarendra Modiनरेंद्र मोदी