शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
7
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
8
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
9
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
10
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
11
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
12
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
13
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
14
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
15
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
16
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
17
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
19
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
20
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...

मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 14:56 IST

मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. ​​​​​​​

बंगळुरू- आपली मते थेट, निर्भिडपणे व्यक्त करणाऱ्या मल्लिकार्जून खर्गे यांनी आपण कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी 2004 साली गमावली अशी नेहमीच्याच स्पष्ट शब्दांमध्ये खंत व्यक्त केली आहे. मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत.2004 साली काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या सरकारमध्ये आपल्याला मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी होती असं मत त्यांनी काल माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंह यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 2004 साली माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा आणि आपल्यामध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात काय चर्चा झाली हेसुद्धा त्यांनी यावेळेस सांगून टाकले. 'तू सरळस्पष्ट बोलणारा नेता आहेस आणि तू दुसऱ्या बाजूकडून कोणताही सल्ला विचारात घेणार नाहीस'. असे देवेगौडा आपल्याला 2004 साली नेतानिवडीच्यावेळी दिल्लीमध्ये म्हणाले होते. तसेच ''ते (देवेगौडा) मुख्यमंत्री असताना विरोधीपक्षनेता म्हणून मी (खर्गे) टिकाकाराच्या भूमिकेत होतो म्हणून त्यांनी धरमसिंह यांची 'जुळवून घेणारा नेता' म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली'' असे खर्गे यांनी स्पष्ट केले.काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एच. के. पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनामुळेही माझ्या भविष्यावर परिणाम झाला. या पुस्तकामध्ये जनता दल सेक्युलरवर टीका केली असल्याचे देवेगौडा यांनी सरकारस्थापनेच्या आधी लक्षात आणून दिले होते अशी आठवण खर्गे यांनी सांगितली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पूत्र एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे पाहात,'' ही घटना 2004 साली झाल्याचे सांगितले. मी खोटे बोलत नाही, वाटल्यास तुम्ही (कुमारस्वामी) तुमच्या वडिलांना विचारून पाहा'' असेही सांगितले.

खर्गे यांनी यावेळी धरमसिंह यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. देवेगौडा यांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्यावर धरमसिंह यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले सहकार्य मला हवे आहे असे सांगितल्याचे खर्गे म्हणाले. धरमसिंह यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. सर्वांशी सहमत होणे राजकारणात शक्य नाही. मात्र सर्वांच्या मताचा आदर करण्याचा गुण धरमसिंह यांच्यामध्ये होता. त्यांनी अजातशत्रू अशी ओळख त्यामुळेच मिळवली होती.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसkumarswamyकुमारस्वामीChief Ministerमुख्यमंत्री