शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 14:56 IST

मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. ​​​​​​​

बंगळुरू- आपली मते थेट, निर्भिडपणे व्यक्त करणाऱ्या मल्लिकार्जून खर्गे यांनी आपण कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी 2004 साली गमावली अशी नेहमीच्याच स्पष्ट शब्दांमध्ये खंत व्यक्त केली आहे. मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत.2004 साली काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या सरकारमध्ये आपल्याला मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी होती असं मत त्यांनी काल माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंह यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 2004 साली माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा आणि आपल्यामध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात काय चर्चा झाली हेसुद्धा त्यांनी यावेळेस सांगून टाकले. 'तू सरळस्पष्ट बोलणारा नेता आहेस आणि तू दुसऱ्या बाजूकडून कोणताही सल्ला विचारात घेणार नाहीस'. असे देवेगौडा आपल्याला 2004 साली नेतानिवडीच्यावेळी दिल्लीमध्ये म्हणाले होते. तसेच ''ते (देवेगौडा) मुख्यमंत्री असताना विरोधीपक्षनेता म्हणून मी (खर्गे) टिकाकाराच्या भूमिकेत होतो म्हणून त्यांनी धरमसिंह यांची 'जुळवून घेणारा नेता' म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली'' असे खर्गे यांनी स्पष्ट केले.काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एच. के. पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनामुळेही माझ्या भविष्यावर परिणाम झाला. या पुस्तकामध्ये जनता दल सेक्युलरवर टीका केली असल्याचे देवेगौडा यांनी सरकारस्थापनेच्या आधी लक्षात आणून दिले होते अशी आठवण खर्गे यांनी सांगितली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पूत्र एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे पाहात,'' ही घटना 2004 साली झाल्याचे सांगितले. मी खोटे बोलत नाही, वाटल्यास तुम्ही (कुमारस्वामी) तुमच्या वडिलांना विचारून पाहा'' असेही सांगितले.

खर्गे यांनी यावेळी धरमसिंह यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. देवेगौडा यांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्यावर धरमसिंह यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले सहकार्य मला हवे आहे असे सांगितल्याचे खर्गे म्हणाले. धरमसिंह यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. सर्वांशी सहमत होणे राजकारणात शक्य नाही. मात्र सर्वांच्या मताचा आदर करण्याचा गुण धरमसिंह यांच्यामध्ये होता. त्यांनी अजातशत्रू अशी ओळख त्यामुळेच मिळवली होती.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसkumarswamyकुमारस्वामीChief Ministerमुख्यमंत्री