शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी मी गमावली; मल्लिकार्जून खर्गे यांनी व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2018 14:56 IST

मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत. ​​​​​​​

बंगळुरू- आपली मते थेट, निर्भिडपणे व्यक्त करणाऱ्या मल्लिकार्जून खर्गे यांनी आपण कर्नाटकाचे मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी 2004 साली गमावली अशी नेहमीच्याच स्पष्ट शब्दांमध्ये खंत व्यक्त केली आहे. मल्लिकार्जून खर्गे हे काँग्रेसचे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते असून ते 2009 पासून कर्नाटकातून लोकसभेत निवडून गेले आहेत. खर्गे सध्या लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते आहेत.2004 साली काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्या सरकारमध्ये आपल्याला मुख्यमंत्री होण्याची सुवर्णसंधी होती असं मत त्यांनी काल माजी मुख्यमंत्री एन. धरमसिंह यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. 2004 साली माजी पंतप्रधान एच.डी देवेगौडा आणि आपल्यामध्ये मुख्यमंत्रीपदासंदर्भात काय चर्चा झाली हेसुद्धा त्यांनी यावेळेस सांगून टाकले. 'तू सरळस्पष्ट बोलणारा नेता आहेस आणि तू दुसऱ्या बाजूकडून कोणताही सल्ला विचारात घेणार नाहीस'. असे देवेगौडा आपल्याला 2004 साली नेतानिवडीच्यावेळी दिल्लीमध्ये म्हणाले होते. तसेच ''ते (देवेगौडा) मुख्यमंत्री असताना विरोधीपक्षनेता म्हणून मी (खर्गे) टिकाकाराच्या भूमिकेत होतो म्हणून त्यांनी धरमसिंह यांची 'जुळवून घेणारा नेता' म्हणून मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली'' असे खर्गे यांनी स्पष्ट केले.काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एच. के. पाटील यांच्या पुस्तक प्रकाशनामुळेही माझ्या भविष्यावर परिणाम झाला. या पुस्तकामध्ये जनता दल सेक्युलरवर टीका केली असल्याचे देवेगौडा यांनी सरकारस्थापनेच्या आधी लक्षात आणून दिले होते अशी आठवण खर्गे यांनी सांगितली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री व देवेगौडा यांचे पूत्र एच. डी. कुमारस्वामी यांच्याकडे पाहात,'' ही घटना 2004 साली झाल्याचे सांगितले. मी खोटे बोलत नाही, वाटल्यास तुम्ही (कुमारस्वामी) तुमच्या वडिलांना विचारून पाहा'' असेही सांगितले.

खर्गे यांनी यावेळी धरमसिंह यांच्या आठवणींना उजाळा दिल्या. देवेगौडा यांनी त्यांच्या नावाला पसंती दिल्यावर धरमसिंह यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपले सहकार्य मला हवे आहे असे सांगितल्याचे खर्गे म्हणाले. धरमसिंह यांचे सर्व पक्षांमध्ये मित्र होते. सर्वांशी सहमत होणे राजकारणात शक्य नाही. मात्र सर्वांच्या मताचा आदर करण्याचा गुण धरमसिंह यांच्यामध्ये होता. त्यांनी अजातशत्रू अशी ओळख त्यामुळेच मिळवली होती.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसkumarswamyकुमारस्वामीChief Ministerमुख्यमंत्री