शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

'मी 10 वर्षांपासून सोनिया गांधींना भेटू शकलो नाही', मणिशंकर अय्यर यांचे पुस्तकातून खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:46 IST

काँग्रेसचे दिग्गज नेते मणिशंकर अय्यर यांनी आपल्या 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' या पुस्तकातून अनेक खुलासे केले आहेत.

Mani Shankar Aiyar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी एक पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील विविध घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' असे या पुस्तकाचे नाव असून, याबद्दल अय्यर म्हणतात की, "माझी राजकीय कारकीर्द गांधी कुटुंबापासून सुरू झाली आणि त्यांनीच संपवली." विशेष म्हणजे, गेल्या 10 वर्षांपासून सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटण्याची संधी मिळाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

मणिशंकर अय्यर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि गांधी कुटुंबाबाबतचे त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय अनुभव शेअर केले. 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' पुस्तकातून अय्यर यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. गांधी कुटुंबाबात बोलताना ते म्हणतात, "मला दहा वर्षांत एकदाही सोनिया गांधींना भेटण्याची संधी मिळाली नाही. राहुल गांधी एकदाच भेटले." त्यांच्या या दाव्यांमुळे काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुस्तकात कोणत्या गोष्टींचा उल्लेख ?आपल्या पुस्तकात अय्यर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस, नरसिंह राव यांचा काळ, UPA I मध्ये मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ, त्यांचे राजकीय पतन आणि UPA II सरकारचा मागोवा घेतला आहे. अय्यर यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या खराब कामगिरीचाही उल्लेख केला. 1984 मधील 404 जागांवरून 2014 मध्ये 44 जागांवर घसरल्याने काँग्रेसची कामगिरी निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते वृत्तसंस्थेशी बोलताना अय्यर यांनी हेही मान्य केले की, प्रणव मुखर्जी 2012 मध्ये पंतप्रधान झाले असते, तर 2014 चा पराभव कदाचित इतका लज्जास्पद नसता. मनमोहन सिंग यांच्या जागी प्रणव मुखर्जी यांची ऊर्जा आणि करिष्माई नेतृत्व काँग्रेससाठी सकारात्मक ठरू शकले असते. 2013 मध्ये काँग्रेस नेत्यांवर अनेक आरोप करण्यात आले होते, जे कायदेशीररित्या सिद्ध होऊ शकले नाहीत. सरकार आणि पक्ष माध्यमांच्या प्रश्नांना नीट उत्तरे देऊ शकले नाहीत, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला.

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा आणि अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलनामुळे सरकारला मोठा तोटा झाला. अण्णा हजारे यांना सुरुवातीला रामलीला मैदानावर उपोषण करू न देणे आणि नंतर परवानगी देणे, ही घटना चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले. शेवटी आपल्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीबाबत बोलताना अय्यर म्हणतात, मला पक्षाबाहेर राहण्याची सवय झाली आहे. मी अजूनही पक्षाचा सदस्य आहे. मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर