शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

'मी 10 वर्षांपासून सोनिया गांधींना भेटू शकलो नाही', मणिशंकर अय्यर यांचे पुस्तकातून खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 13:46 IST

काँग्रेसचे दिग्गज नेते मणिशंकर अय्यर यांनी आपल्या 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' या पुस्तकातून अनेक खुलासे केले आहेत.

Mani Shankar Aiyar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी एक पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यातील विविध घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' असे या पुस्तकाचे नाव असून, याबद्दल अय्यर म्हणतात की, "माझी राजकीय कारकीर्द गांधी कुटुंबापासून सुरू झाली आणि त्यांनीच संपवली." विशेष म्हणजे, गेल्या 10 वर्षांपासून सोनिया गांधी आणि राहुल गांधींना भेटण्याची संधी मिळाली नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

मणिशंकर अय्यर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस आणि गांधी कुटुंबाबाबतचे त्यांचे वैयक्तिक आणि राजकीय अनुभव शेअर केले. 'अ मॅव्हरिक इन पॉलिटिक्स' पुस्तकातून अय्यर यांनी आपल्या राजकीय आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. गांधी कुटुंबाबात बोलताना ते म्हणतात, "मला दहा वर्षांत एकदाही सोनिया गांधींना भेटण्याची संधी मिळाली नाही. राहुल गांधी एकदाच भेटले." त्यांच्या या दाव्यांमुळे काँग्रेस नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

पुस्तकात कोणत्या गोष्टींचा उल्लेख ?आपल्या पुस्तकात अय्यर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे सुरुवातीचे दिवस, नरसिंह राव यांचा काळ, UPA I मध्ये मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ, त्यांचे राजकीय पतन आणि UPA II सरकारचा मागोवा घेतला आहे. अय्यर यांनी 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या खराब कामगिरीचाही उल्लेख केला. 1984 मधील 404 जागांवरून 2014 मध्ये 44 जागांवर घसरल्याने काँग्रेसची कामगिरी निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रणव मुखर्जी पंतप्रधान झाले असते वृत्तसंस्थेशी बोलताना अय्यर यांनी हेही मान्य केले की, प्रणव मुखर्जी 2012 मध्ये पंतप्रधान झाले असते, तर 2014 चा पराभव कदाचित इतका लज्जास्पद नसता. मनमोहन सिंग यांच्या जागी प्रणव मुखर्जी यांची ऊर्जा आणि करिष्माई नेतृत्व काँग्रेससाठी सकारात्मक ठरू शकले असते. 2013 मध्ये काँग्रेस नेत्यांवर अनेक आरोप करण्यात आले होते, जे कायदेशीररित्या सिद्ध होऊ शकले नाहीत. सरकार आणि पक्ष माध्यमांच्या प्रश्नांना नीट उत्तरे देऊ शकले नाहीत, त्यामुळे विरोधकांच्या आरोपांमुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला.

कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा आणि अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखालील 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' आंदोलनामुळे सरकारला मोठा तोटा झाला. अण्णा हजारे यांना सुरुवातीला रामलीला मैदानावर उपोषण करू न देणे आणि नंतर परवानगी देणे, ही घटना चुकीची असल्याचेही त्यांनी म्हटले. शेवटी आपल्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीबाबत बोलताना अय्यर म्हणतात, मला पक्षाबाहेर राहण्याची सवय झाली आहे. मी अजूनही पक्षाचा सदस्य आहे. मी कधीही भाजपमध्ये जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर