शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

Congress Shashi Tharoor : “मला अदानी अंबानींशी ॲलर्जी नाही, जे माझ्या देशात…” पाहा काय म्हणाले शशी थरूर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 08:28 IST

अदानी समूहाने राजस्थानमध्ये निरनिराळ्या क्षेत्रात ६५ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या राजस्थानमध्ये (Rajasthan) पुढील पाच वर्षांत ६५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या घोषणेवर काँग्रेस नेते शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी त्यांचे पक्षातील सहकारी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचा पुनरुच्चार केला आहे. गेहलोत यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांचे इन्व्हेस्ट राजस्थान समिटमध्ये स्वागत केले होते. जिथे अदानी यांनी त्यांच्या समूहाच्या वतीने राज्यासाठी विविध घोषणाही केल्या होत्या.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रविवारी मुंबईत एनडीटीव्हीच्या विशेष टाऊनहॉलमध्ये थरूर यांना प्रेक्षकांनी भारताच्या आर्थिक विकासावर प्रश्न विचारला. यात काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याद्वारे मोठ्या व्यावसायिकांना कथितरित्या मदत करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात येत असलेल्या टीकेचा उल्लेख करण्यात आला. “मला अदानी, अंबानी किंवा आणखी कोणाशीही ॲलर्जी नाही, जे माझ्या देशात गुंतवणूकीद्वारे भारतीयांना रोजगार मिळवून देण्यात माझ्या देशातील लोकांच्या हिताची सेवा करण्यास तयार आहेत,” असं थरूर म्हणाले.

"खरी काँग्रेस म्हणते आणि गेहलोत म्हणाले होते की, जर कोणी माझ्या राज्यात येऊन गुंतवणूक करण्यास, नोकऱ्या निर्माण करण्यास, महसूल मिळवून देण्यास तयार असेल तर मला ते हवे आहे. अदानी यांनी तिरुअनंतपुरम विमानतळासाठी बोली लावली तेव्हाही माझे हेच विचार होते. त्यांनी निष्पक्ष विजय मिळवला आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे. माझ्याच मतदारसंघात हेच घडलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्यथरूर यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्य निवडणुकीबाबत मोठं वक्तव्यही केलं. मी या निवडणुकीत उमेदवार आहे, पण मी अशा काही गोष्टी ऐकल्या की, ही निवडणूक खरोखरच निष्पक्ष होणार आहे का, असा विचार करायला भाग पडतंय, असं थरूर म्हणाले. या निवडणुकीत खर्गे यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे, असं मला पक्षाच्या काही नेत्यांनी सांगितल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र, त्यांनी यासाठी गांधी कुटुंबावर आणि विशेषत: सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर कोणतेही आरोप करण्यावर स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.

“गांधी कुटुंबीयांनी या निवडणुकीबाबत आधीच स्पष्ट केले आहे की ते अधिकृतपणे आपल्याकडून कोणालाही या पदासाठी उमेदवार बनवत नाहीत. या निवडणुकीत गांधी कुटुंबीय पूर्णपणे निष्पक्ष आहे आणि या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनीही या निवडणुकीत कोणीही कोणाच्या बाजूनं नसल्याचं स्पष्ट केलं आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरcongressकाँग्रेसGautam Adaniगौतम अदानीMukesh Ambaniमुकेश अंबानी