शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 14:09 IST

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार आसाम आणि ईशान्येच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील दरंग येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले माँ कामाख्याच्या आशीर्वादाने ऑपरेशन सिंदूरला जबरदस्त यश मिळाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला. "मी भगवा न शिव यांचा भक्त आहे, सर्व विष गिळून टाकतो."

"...ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट होती" -पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार आसाम आणि ईशान्येच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. भूपेन हजारिका यांचे स्मरण करत पंतप्रधान म्हणाले, काही दिवसांपूर्वी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणे, ही आपल्यासाठी भाग्याची गोष्ट होती. आसामच्या महान पुत्रांनी आणि पूर्वजांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षावरही निशाणा साधला. "ज्या दिवशी भारत सरकारने भूपेन हजारिका यांना भारतरत्न दिले, त्याच दिवशी काँग्रेस अध्यक्षांनी मोदी "नाचणाऱ्या आणि गाणाऱ्यांना" भारतरत्न देत आहेत, असे म्हणत त्यांचा अपमान केला होता, अशी आठवणही त्यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, हे विधान आसाम आणि तेथील लोकांच्या योगदानाचा अपमान करणारे आहे. 

१९६२ च्या चीन युद्धाचा उल्लेख - -१९६२ मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, पंडित नेहरूंनी त्यावेळी केलेल्या विधानामुळे, ईशान्येकडील जखमा आजपर्यंत भरल्या गेलेल्या नाहीत. काँग्रेसची सध्याची पिढीही त्याच जखमांवर मीठ शिंपडण्याचे काम करत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी ककेला.

'मी शिव भक्त, सर्व विष गिळून घेतो...' -पंतप्रधान म्हणाले, "मला कितीही शिव्या द्या, मी भगवान शिव यांचा भक्त आहे, सर्व विष गिळून घेतो. पण जेव्हा दुसऱ्याचा अपमान होतो, तेव्हा मी गप्प राहू शकत नाही." भूपेन दा यांना भारतरत्न देण्याचा निर्णय योग्य होता की नाही असा प्रश्नही त्यांनी यावेळी जनतेला विचारला. एवढेच नाही, तर देशातील जनता माजी मालक आहे, असेही ते यावेली म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेस