शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

हनिमूनला जाताच पतीनं बोलणं बंद केलं, मग केली अशी मागणी, आता सासरच्या घराबाहेर महिला करतेय आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:00 IST

महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संगल नावाच्या महिलेच्या वाट्याला संसाराचा अतिशय कटू अनुभव आला असून, तिला आता अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चक्क सासरच्या मंडळींविरोधातच आंदोलनाला बसावं लागलं आहे. 

विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. इथून संसाराला नवं वळण मिळतं. अनेकजण विवाहानंतच्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत असतात. पण काही जणांच्या वाट्याला मात्र विवाहानंतर खडतर अनुभव येतात. त्यामधून त्यांना जगणं नकोसं होतं. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संगल नावाच्या महिलेच्या वाट्याला असाच अनुभव आला असून, तिला आता अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चक्क सासरच्या मंडळींविरोधातच आंदोलनाला बसावं लागलं आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी शालिनी आणि प्रणव यांचा विवाह मुझफ्फरनगर येथे अगदी धुमधडाक्यात झाला होता. त्यानंतर सुखी संसाराची आणि हनिमुनच्या रोमँटिक अनुभवाची स्वप्नं रंगवत शालिनी ही पती प्रणवसोबत हनिमूनसाठी रवाना झाली. तिथे पोहोचताच मात्र सगळं चित्रच बदलून गेलं. पती प्रणवनं शालिनीसोबत बोलणं बंद केलं. एवढंच नाही तर त्याने ५० लाख रुपयांची मागणी केली. तसेच हनिमूनहून परतल्यानंतर शालिनी हिला माहेरी पाठवले. तसेच तिला परत आणलंच नाही. त्यानंतर शालिनी जेव्हा स्वत:हून माघारी आली. तेव्हा सासरच्या मंडळींनी तिच्यासाठी घराचे दरवाजेदेखील उघडले नाहीत. त्यामुळे शालिनी हिने सासरच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. एवढंच नाही तर शालिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी तिथेच जीवन संपवण्याची धमकीही दिली आहे.

याबाबत शालिनी हिने सांगितले की, माझं लग्न प्रणव सिंगल याच्यासोबत झालं होतं. आम्ही हनिमूनसाठी इंडोनेशियातील बाली येथे गेलो होतो. तिथे प्रणवचं वागणं अचानक बदललं. तो म्हणाला की, मला खूप खर्च झाला आहे. लग्न आणि घर बांधण्यामध्ये खूप पैसे खर्च झाले आहेत. आता तुला आम्हा लोकांसोबत राहायचं असेल, तर माहेरून ५० लाख रुपये घेऊन ये. तेव्हा मला वाटलेलं की वेळेबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. ५० लाख रुपये ही माझ्या वडिलांकडे मागून सहज मिळतील अशी परिस्थिती नव्हती. ते एवढ्या तातडीने एवढे पैसे देऊ शकले नसते. दरम्यान, काही दिवसांनंतर सासरच्या मंडळींनी माझ्यासोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं.

अखेर प्रथा असल्याचं सांगत होळीसाठी मला माहेरी पाठवलं. मात्र नंतर मला नेण्यासाठी कुणीच आलं नाही. शेवटी मी स्वत: काका आणि इतर मंडळींना घेऊन सासरी आले. मात्र मला घरात प्रवेश करू दिला नाही. मला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर पोलिसांनाही बोलावलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आतापर्यंत आमच्याकडे कुणाकडूनही कुठलीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार मिळाल्यानंतरच आम्ही यावर काही तरी बोलू.  

 

टॅग्स :WomenमहिलाFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारी