शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

हनिमूनला जाताच पतीनं बोलणं बंद केलं, मग केली अशी मागणी, आता सासरच्या घराबाहेर महिला करतेय आंदोलन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:00 IST

महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संगल नावाच्या महिलेच्या वाट्याला संसाराचा अतिशय कटू अनुभव आला असून, तिला आता अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चक्क सासरच्या मंडळींविरोधातच आंदोलनाला बसावं लागलं आहे. 

विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. इथून संसाराला नवं वळण मिळतं. अनेकजण विवाहानंतच्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत असतात. पण काही जणांच्या वाट्याला मात्र विवाहानंतर खडतर अनुभव येतात. त्यामधून त्यांना जगणं नकोसं होतं. महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संगल नावाच्या महिलेच्या वाट्याला असाच अनुभव आला असून, तिला आता अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चक्क सासरच्या मंडळींविरोधातच आंदोलनाला बसावं लागलं आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी १२ फेब्रुवारी रोजी शालिनी आणि प्रणव यांचा विवाह मुझफ्फरनगर येथे अगदी धुमधडाक्यात झाला होता. त्यानंतर सुखी संसाराची आणि हनिमुनच्या रोमँटिक अनुभवाची स्वप्नं रंगवत शालिनी ही पती प्रणवसोबत हनिमूनसाठी रवाना झाली. तिथे पोहोचताच मात्र सगळं चित्रच बदलून गेलं. पती प्रणवनं शालिनीसोबत बोलणं बंद केलं. एवढंच नाही तर त्याने ५० लाख रुपयांची मागणी केली. तसेच हनिमूनहून परतल्यानंतर शालिनी हिला माहेरी पाठवले. तसेच तिला परत आणलंच नाही. त्यानंतर शालिनी जेव्हा स्वत:हून माघारी आली. तेव्हा सासरच्या मंडळींनी तिच्यासाठी घराचे दरवाजेदेखील उघडले नाहीत. त्यामुळे शालिनी हिने सासरच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं. एवढंच नाही तर शालिनी आणि तिच्या कुटुंबीयांनी तिथेच जीवन संपवण्याची धमकीही दिली आहे.

याबाबत शालिनी हिने सांगितले की, माझं लग्न प्रणव सिंगल याच्यासोबत झालं होतं. आम्ही हनिमूनसाठी इंडोनेशियातील बाली येथे गेलो होतो. तिथे प्रणवचं वागणं अचानक बदललं. तो म्हणाला की, मला खूप खर्च झाला आहे. लग्न आणि घर बांधण्यामध्ये खूप पैसे खर्च झाले आहेत. आता तुला आम्हा लोकांसोबत राहायचं असेल, तर माहेरून ५० लाख रुपये घेऊन ये. तेव्हा मला वाटलेलं की वेळेबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. ५० लाख रुपये ही माझ्या वडिलांकडे मागून सहज मिळतील अशी परिस्थिती नव्हती. ते एवढ्या तातडीने एवढे पैसे देऊ शकले नसते. दरम्यान, काही दिवसांनंतर सासरच्या मंडळींनी माझ्यासोबत बोलणं पूर्णपणे बंद केलं.

अखेर प्रथा असल्याचं सांगत होळीसाठी मला माहेरी पाठवलं. मात्र नंतर मला नेण्यासाठी कुणीच आलं नाही. शेवटी मी स्वत: काका आणि इतर मंडळींना घेऊन सासरी आले. मात्र मला घरात प्रवेश करू दिला नाही. मला तिथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर पोलिसांनाही बोलावलं. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, आतापर्यंत आमच्याकडे कुणाकडूनही कुठलीही लेखी तक्रार आलेली नाही. तक्रार मिळाल्यानंतरच आम्ही यावर काही तरी बोलू.  

 

टॅग्स :WomenमहिलाFamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपCrime Newsगुन्हेगारी