शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीने भोगला 12 वर्षांचा तुरूंगवास अन् प्रियकरासोबत सापडली 'ती'...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 11:41 IST

उत्तर प्रदेशातील अमेठी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमेठी: उत्तर प्रदेशातीलअमेठी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर इथे एका व्यक्तीला कोणताही गुन्हा न करता तुरुंगवास भोगावा लागला. ज्या पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला तुरुंगात राहावे लागले, ती पत्नी तब्बल 12 वर्षांनंतर अचानक जिवंत सापडल्याने खळबळ उडाली आहे. रायबरेली जिल्ह्यात पतीला पत्नी सापडली आहे. त्यामुळे आता त्याचे कुटुंबीय याप्रकरणी तोडगा काढण्याची मागणी करत आहेत.

ही संपूर्ण घटना अमेठी जिल्ह्यातील जैस पोलीस ठाण्याच्या अली नगर भागातील आहे. जिथे मनोज कुमार वर्मा त्याची पत्नी सीमा वर्मासोबत राहत होता. 25 मार्च 2011 रोजी मनोजची पत्नी सीमा वर्मा अचानक गायब झाली. खूप शोध घेऊनही पत्नी सापडली नाही. मग मनोजच्या सासरच्यांनी सीमा वर्माचा पती मनोज वर्माविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याच्यावर स्वत:च्या पत्नीची हत्या करून मृतदेह लपवल्याचा आरोप केला. त्यानंतर मनोजला 11 दिवस तुरुंगवास भोगावा लागला. 

असा झाला खुलासा तुरूंगातून जामिनावर सुटल्यानंतर मनोज हा त्याच्या पत्नीचा शोध घेत होता. यासोबतच या प्रकरणाबाबत तो न्यायालयाच्या चकरा मारत होता. त्याचवेळी 11 वर्षांनंतर मनोजला त्याची पत्नी जिवंत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्याची पत्नी 3 मुलांसोबत आपल्या प्रियकरासोबत राहत असल्याची मनोजला प्राथमिक माहिती मिळाली. त्यानंतर मनोजने रायबरेली जिल्ह्यातील भडोखर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अन्य कायदेशीर कारवाई केली. 

पीडित पती मनोजने सांगितले की, त्याची पत्नी सीमा रायबरेलीची रहिवासी आहे, 12 वर्षांपूर्वी तिने एका व्यक्तीसोबत पळून जाऊन विवाह केला होता. हे माहीत असतानाही त्यांच्या कुटुंबीयांनी आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मला तुरुंगवास भोगावा लागला. 12 वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यामुळे आमचा उदरनिर्वाह हिरावला गेला आहे. आम्हाला निर्दोष सिद्ध करता यावे यासाठी पत्नीचे म्हणणे न्यायालयात व्हावे, अशी आमची इच्छा आहे. 

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हपत्नी जिवंत मिळाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पत्नीच्या माहेरच्यांनी केलेले आरोप देखील खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या आरोपामुळे पीडित तरूणाला 11 दिवस तुरुंगवास भोगण्याव्यतिरिक्त न्यायासाठी 12 वर्षे न्यायालयात चकरा माराव्या लागल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीmarriageलग्नamethi-pcअमेठी