शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू- काश्मीरमध्ये त्रिशंकू स्थिती

By admin | Updated: December 23, 2014 14:03 IST

जम्मू-काश्मीरध्ये एकाही पक्षाला बहुमत नसल्याने राज्यात त्रिशंकू अवस्था होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर, दि.२३ - दहशतवादामुळे धुमसत असलेल्या काश्मीर खो-यातील नागरिकांनी बुलेटने बॅलेटला उत्तर देत विक्रमी मतदान केल्यानंतर राज्यात सत्ता बदलाचे वारे वाहू लागले असून भाजपा व पीडीपी यांच्यातील लढतीमुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. पीडीपी २६ तर भाजपा २५ जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स पक्ष मागे फेकला गेला आहे. एनसी १७ तर काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर आहे. सध्या कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नसले तरी सत्ता स्थापनेसाठी भाजपा पीडीपीची साथ घेईल अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

८७ जागांसाठी झालेल्या या विधानसभा निवडणुकीदरम्यान दहशतवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता नागरिकांनी निर्भयपणे मतदान केले. मोदींच्या करिश्म्यामुळे भाजपाने प्रथमच या राज्यात एवढी मुसंडी मारली आहे. नॅशनल कॉन्फरन्सची घसरण कायम असून  काँग्रेस पक्ष चौथ्या स्थानावर आहे.

मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांना पराभवाचा धक्का
राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला नॅशनल कॉन्फरन्स पक्ष पिछाडीवर गेलेला असतानाच जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांना पराभवाचा  धक्का बसला आहे. सोनावर या मतदारसंघात अब्दुल्ला यांचा पराभव झाला आहे. 
पीडीपीच्या अशरफ मीर यांनी त्यांना सोनावरमध्ये पराभव केला आहे. दरम्यान पराभवानंतर अब्दुल्ला यांनी ट्विटरवरून मीर यांना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या.