शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 09:52 IST

खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे.

कलबुर्गी (कर्नाटक) : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सर्वत्र पराभव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा नारा कसा देत आहेत, याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी आघाडी ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले.

खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक जनता आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आहे, कारण लोक आता विशेषतः वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे नाराज आहेत. लोकशाही आणि भारतीय संविधानावर मोठा हल्ला केला जात आहे, असेही ते म्हणाले.

जनता प्रचंड नाराज असून, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करून भाजप सरकार चालवत आहे. त्यामुळे जनता प्रचंड नाराज असून, विरोधी आघाडी ‘इंडिया’ला पाठिंबा देत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडे मोठी संधी आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची पूर्ण क्षमता इंडिया आघाडीकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

निकालासाठी ४ जूनची वाट पाहाजनतेला निकालासाठी ४ जूनची वाट पाहण्यास सांगून ते म्हणाले की, निकाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. इंडियाला किती जागा मिळतील असे विचारले असता, खरगे यांनी निश्चित संख्या सांगू शकत नाही. मी अशाप्रकारे मोजणी केलेली नाही, कारण राजकारणात अशी मोजणी फारच कमी होते. भाजपचा सर्वच राज्यांत पराभव होत आहे, असे खरगे पुढे म्हणाले.

त्यांना कळते कसे? पंतप्रधानांना हे कसे कळते की भाजप ४०० पेक्षा जास्त जागा मिळवत आहे. कर्नाटकात आम्हाला २०१९ मध्ये एक जागा मिळाली. आता आम्हाला एकापेक्षा जास्त जागा मिळणार की नाही ते तुम्हीच सांगा. काँग्रेस चार जागा जिंकेल असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. ही जागांची वाढ की घट, असे खरगे यांनी विचारले.

असे मांडले गणिततेलंगणात काँग्रेसला २०१९ मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. येथे काँग्रेसच्या जागा वाढतील. केरळमध्ये आम्हाला जास्त जागा मिळतील.महाराष्ट्रात आमच्या आघाडीला ५० टक्क्यांहून अधिक जागा मिळतील. राजस्थानमध्ये आम्ही शून्य होतो. यावेळी आम्हाला सात ते आठ जागा मिळत आहेत. मध्य प्रदेशात आमच्या जागा वाढतील. छत्तीसगडमध्ये आम्ही वाढत आहोत. मग ते कोणत्या आधारावर ४०० पारचा नारा देत आहेत?, असे ते म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे