शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 09:52 IST

खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे.

कलबुर्गी (कर्नाटक) : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सर्वत्र पराभव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा नारा कसा देत आहेत, याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी आघाडी ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले.

खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक जनता आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आहे, कारण लोक आता विशेषतः वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे नाराज आहेत. लोकशाही आणि भारतीय संविधानावर मोठा हल्ला केला जात आहे, असेही ते म्हणाले.

जनता प्रचंड नाराज असून, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करून भाजप सरकार चालवत आहे. त्यामुळे जनता प्रचंड नाराज असून, विरोधी आघाडी ‘इंडिया’ला पाठिंबा देत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडे मोठी संधी आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची पूर्ण क्षमता इंडिया आघाडीकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

निकालासाठी ४ जूनची वाट पाहाजनतेला निकालासाठी ४ जूनची वाट पाहण्यास सांगून ते म्हणाले की, निकाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. इंडियाला किती जागा मिळतील असे विचारले असता, खरगे यांनी निश्चित संख्या सांगू शकत नाही. मी अशाप्रकारे मोजणी केलेली नाही, कारण राजकारणात अशी मोजणी फारच कमी होते. भाजपचा सर्वच राज्यांत पराभव होत आहे, असे खरगे पुढे म्हणाले.

त्यांना कळते कसे? पंतप्रधानांना हे कसे कळते की भाजप ४०० पेक्षा जास्त जागा मिळवत आहे. कर्नाटकात आम्हाला २०१९ मध्ये एक जागा मिळाली. आता आम्हाला एकापेक्षा जास्त जागा मिळणार की नाही ते तुम्हीच सांगा. काँग्रेस चार जागा जिंकेल असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. ही जागांची वाढ की घट, असे खरगे यांनी विचारले.

असे मांडले गणिततेलंगणात काँग्रेसला २०१९ मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. येथे काँग्रेसच्या जागा वाढतील. केरळमध्ये आम्हाला जास्त जागा मिळतील.महाराष्ट्रात आमच्या आघाडीला ५० टक्क्यांहून अधिक जागा मिळतील. राजस्थानमध्ये आम्ही शून्य होतो. यावेळी आम्हाला सात ते आठ जागा मिळत आहेत. मध्य प्रदेशात आमच्या जागा वाढतील. छत्तीसगडमध्ये आम्ही वाढत आहोत. मग ते कोणत्या आधारावर ४०० पारचा नारा देत आहेत?, असे ते म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे