शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
7
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
8
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
9
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
10
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
11
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
12
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
13
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
14
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
15
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
16
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
17
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
18
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
19
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
20
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...

कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 09:52 IST

खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे.

कलबुर्गी (कर्नाटक) : भारतीय जनता पक्षाचा (भाजप) सर्वत्र पराभव होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचा नारा कसा देत आहेत, याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी आश्चर्य व्यक्त केले. विरोधी आघाडी ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले.

खरगे यांनी त्यांच्या जन्मगावी कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, जनतेने विरोधी आघाडी ‘इंडिया’ला चांगला पाठिंबा दिला आहे. ही निवडणूक जनता आणि पंतप्रधान मोदी यांच्यात आहे, कारण लोक आता विशेषतः वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे नाराज आहेत. लोकशाही आणि भारतीय संविधानावर मोठा हल्ला केला जात आहे, असेही ते म्हणाले.

जनता प्रचंड नाराज असून, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करून भाजप सरकार चालवत आहे. त्यामुळे जनता प्रचंड नाराज असून, विरोधी आघाडी ‘इंडिया’ला पाठिंबा देत आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडे मोठी संधी आहे. इंडिया आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्याची पूर्ण क्षमता इंडिया आघाडीकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

निकालासाठी ४ जूनची वाट पाहाजनतेला निकालासाठी ४ जूनची वाट पाहण्यास सांगून ते म्हणाले की, निकाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. इंडियाला किती जागा मिळतील असे विचारले असता, खरगे यांनी निश्चित संख्या सांगू शकत नाही. मी अशाप्रकारे मोजणी केलेली नाही, कारण राजकारणात अशी मोजणी फारच कमी होते. भाजपचा सर्वच राज्यांत पराभव होत आहे, असे खरगे पुढे म्हणाले.

त्यांना कळते कसे? पंतप्रधानांना हे कसे कळते की भाजप ४०० पेक्षा जास्त जागा मिळवत आहे. कर्नाटकात आम्हाला २०१९ मध्ये एक जागा मिळाली. आता आम्हाला एकापेक्षा जास्त जागा मिळणार की नाही ते तुम्हीच सांगा. काँग्रेस चार जागा जिंकेल असे प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे. ही जागांची वाढ की घट, असे खरगे यांनी विचारले.

असे मांडले गणिततेलंगणात काँग्रेसला २०१९ मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. येथे काँग्रेसच्या जागा वाढतील. केरळमध्ये आम्हाला जास्त जागा मिळतील.महाराष्ट्रात आमच्या आघाडीला ५० टक्क्यांहून अधिक जागा मिळतील. राजस्थानमध्ये आम्ही शून्य होतो. यावेळी आम्हाला सात ते आठ जागा मिळत आहेत. मध्य प्रदेशात आमच्या जागा वाढतील. छत्तीसगडमध्ये आम्ही वाढत आहोत. मग ते कोणत्या आधारावर ४०० पारचा नारा देत आहेत?, असे ते म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपाMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे