शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

माल्ल्या आणि नीरव मोदीसारख्या फरारांकडून किती मालमत्ता जप्त केली? सरकारने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 18:46 IST

विजय मल्ल्या आणि नीरव मोदीसारख्या फरार आरोपींकडून किती मालमत्ता जप्त करण्यात आली, याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत दिली.

नवी दिल्ली:नीरव मोदी(Nirav Modi), विजय मल्ल्या(Vijay Mallya)सारख्या कर्ज घेऊन पळून गेलेल्या उद्योगपतींच्या संपत्तीबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मोठी माहिती दिली आहे. कर्ज घेऊन पळून गेलेल्यांची मालमत्ता विकून बँकांनी 12,109 कोटी रुपये वसूल केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सात वर्षांत 5.49 लाख कोटी रुपये सेटलमेंट आणि इतर उपायांद्वारे वसूल करण्यात आल्याचेही त्या म्हणाल्या.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोनामुळे प्रभावित झालेल्या काळात अर्थव्यवस्थेच्या मोठ्या विषयांवर लक्ष केंद्रित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल ही माहिती दिली आहे. 2021-22 या वर्षासाठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांच्या दुसऱ्या तुकडीवर लोकसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री म्हणाल्या, बँका सुरक्षित आहेत, बँकांमधील ठेवीदारांचे पैसे सुरक्षित आहेत. अर्थव्यवस्थेशी संबंधित मोठ्या मुद्द्यांकडे लक्ष दिले जात आहे.

त्या पुढे म्हणाल्या, राज्यांकडे पुरेशी रोकड आहे आणि फक्त दोन राज्यांकडे ऋण शिल्लक आहे. सरकार ई-जीओएमद्वारे खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींशी संबंधित समस्यांवर विचारही विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. याशिवाय, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहते, अशा परिस्थितीत पुरवणी मागण्यांमध्ये खत अनुदानासाठी 58 हजार कोटी रुपये ठेवण्यात आल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

खतांच्या आंतरराष्ट्रीय किमती खूप जास्त असून शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, अशी सरकारची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्या या उत्तरानंतर, लोकसभेने 2021-22 या वर्षासाठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांच्या दुसऱ्या तुकड्याला आणि संबंधित विनियोग विधेयकाला आवाजी मतदानाने मंजुरी दिली.

विरोधकांचा गोंधळचर्चेदरम्यान काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकसभेत अर्थव्यवस्था, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यावरून सरकारला घेरले. अर्थव्यवस्था अडथळ्यांशी झुंजत आहे, सर्वत्र संकटाची परिस्थिती आहे आणि सरकार अवास्तव उद्दिष्टांच्या दिशेने काम करत आहे. अतिशयोक्तीपूर्ण आकडेवारी सादर करत आहेत. तसेच, सरकार एअर इंडियासह अनेक सरकारी मालकीच्या कंपन्यांची विक्री करत आहे,असा आरोप विरोधी पक्षांनी केला.  

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामनVijay Mallyaविजय मल्ल्याNirav Modiनीरव मोदी