शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:05 IST

१८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - बिहारमधील SIR आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल गांधी यांच्या आरोपांचे खंडन करत पुढील ७ दिवसांत त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे अन्यथा देशाची माफी मागावी असं आव्हान केले. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी एकत्रित येत आयोगाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेससह समाजवादी पक्ष, टीएमसी, आरजेडी, आम आदमी पार्टी, शिवसेना ठाकरे गट यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर देत काही प्रश्नही उपस्थित केले आहे.

कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी म्हटलं की, मतदानाचा अधिकार सर्वात महत्त्वाचा आहे. भारतातील अनेक राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत. ज्याचे उत्तर निवडणूक आयुक्त देत नाहीत. ते त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत. काल जी पत्रकार परिषद ECI ने घेतली ती आम्ही पाहिली, ज्यांना विरोधी पक्षांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती, तेच राजकीय पक्षांवर प्रश्न विचारत टीका करत होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच निवडणूक आयोग पोलिंग बूथवरील सीसीटीव्हीवर गप्प होता, १ लाख बोगस मतदारांवर काही उत्तर दिले नाही. निवडणूक आयोगाने हे प्रायव्हेसी उल्लंघन कसे हे सांगायला हवे. निवडणूक आयोगावर दबाव आहे. बिहारमध्ये गडबडीत SIR का केले जात आहे? निवडणूक आयोग प्रश्नांपासून पळत आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व गोष्टी सुप्रीम कोर्टाने नाकारल्या आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर आरोप केले आहेत असंही काँग्रेस नेत्यांनी म्हटलं. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने वारंवार सांगतंय, जे आरोप केले जात आहेत त्यांनी प्रतिज्ञापत्रे दिली पाहिजेत, परंतु जेव्हा अखिलेश यादव यांनी २०२२ मध्ये प्रतिज्ञापत्र दिले तेव्हा काही कारवाई झाली का? कोणतीही कारवाई झाली नाही. अखिलेश यादव यांनी २०२२ च्या निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र दिले होते की सपा समर्थकांची मते मोठ्या प्रमाणात कापली जात आहेत, १८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी