शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 17:05 IST

१८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं. 

नवी दिल्ली - बिहारमधील SIR आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून आता इंडिया आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून पत्रकार परिषद घेतली. त्यात राहुल गांधी यांच्या आरोपांचे खंडन करत पुढील ७ दिवसांत त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे अन्यथा देशाची माफी मागावी असं आव्हान केले. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांनी एकत्रित येत आयोगाच्या कारभारावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेससह समाजवादी पक्ष, टीएमसी, आरजेडी, आम आदमी पार्टी, शिवसेना ठाकरे गट यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर देत काही प्रश्नही उपस्थित केले आहे.

कॉन्स्टिट्यूशनल क्लबच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी म्हटलं की, मतदानाचा अधिकार सर्वात महत्त्वाचा आहे. भारतातील अनेक राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत आहेत. ज्याचे उत्तर निवडणूक आयुक्त देत नाहीत. ते त्यांच्या जबाबदारीपासून पळ काढत आहेत. काल जी पत्रकार परिषद ECI ने घेतली ती आम्ही पाहिली, ज्यांना विरोधी पक्षांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती, तेच राजकीय पक्षांवर प्रश्न विचारत टीका करत होते असं त्यांनी सांगितले. 

तसेच निवडणूक आयोग पोलिंग बूथवरील सीसीटीव्हीवर गप्प होता, १ लाख बोगस मतदारांवर काही उत्तर दिले नाही. निवडणूक आयोगाने हे प्रायव्हेसी उल्लंघन कसे हे सांगायला हवे. निवडणूक आयोगावर दबाव आहे. बिहारमध्ये गडबडीत SIR का केले जात आहे? निवडणूक आयोग प्रश्नांपासून पळत आहे. निवडणूक आयोगाच्या सर्व गोष्टी सुप्रीम कोर्टाने नाकारल्या आहेत. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर आरोप केले आहेत असंही काँग्रेस नेत्यांनी म्हटलं. 

दरम्यान, निवडणूक आयोगाने वारंवार सांगतंय, जे आरोप केले जात आहेत त्यांनी प्रतिज्ञापत्रे दिली पाहिजेत, परंतु जेव्हा अखिलेश यादव यांनी २०२२ मध्ये प्रतिज्ञापत्र दिले तेव्हा काही कारवाई झाली का? कोणतीही कारवाई झाली नाही. अखिलेश यादव यांनी २०२२ च्या निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्र दिले होते की सपा समर्थकांची मते मोठ्या प्रमाणात कापली जात आहेत, १८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देखील देण्यात आले होते, आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही असं समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव यांनी म्हटलं.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी