शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांपूर्वीच मोदींना कसं कळतं की ३७० जागा जिंकणार?; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 14:11 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर सडकून टीका केली.

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना मोदी सरकार २ च्या कार्यकाळातील शेवटचे संसदीय भाषण केले. आपल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका करताना तिसऱ्यांदा मोदी सरकारच सत्तेवर येणार असल्याचेही म्हटले. आता आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ दूर नाही. जास्तीत जास्त १०० ते १२५ दिवस राहिले आहेत. केवळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे नाही, तर संपूर्ण देश सांगत आहे की, ‘अब की बार ४०० पार’. शक्यतो या आकड्यांच्या खेळात जात नाही. मात्र, देशाचे मत आणि सूर समजू लागला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० पेक्षा जास्त जागा मिळतीलच, मात्र भारतीय जनता पार्टीला ३७० जागांवर विजयी करतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मोदींच्या या दाव्यावर आता काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला आहे. 

नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसवर सडकून टीका केली. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आमच्या सरकारचा तिसरा कार्यकाळ खूप मोठ्या निर्णयांचा ठरणार आहे. लाल किल्यावरून भाषण करताना सांगितले होते. तसेच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातही त्याबाबतचा पुनरुच्चार केला होता. पुढील एक हजार वर्षांपर्यंत देशाला समृद्ध आणि सिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेले पाहायचे आहे. तिसऱ्या कार्यकाळात पुढील हजार वर्षांच्या देशाच्या वाटचालीसाठी एक मजूबत पाया तयार केला जाईल. देशातील १४० कोटी जनतेच्या क्षमतेवर माझा खूप मोठा विश्वास आहे. त्यामुळे, भाजपला ३७० आणि एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले. मोदींच्या या विधानावर आक्षेप घेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी सवाल उपस्थित केला आहे. निवडणुकांपूर्वीच मोदींना हे कसं समजलं?, असे चौधरी यांनी म्हटले. 

निवडणुका होण्यापूर्वीच मोदींना कसं समजतं की भाजपाच्या ३७० जागा निवडून येणार आहेत. मात्र, यासारख्या विजयाचा दावा जर कोणी करत असेल तर, आतमध्ये काही गूढ लपलंय, ते गूढ ईव्हीएममध्येही लपलं आहे, असे म्हणत लोकसभा विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या भाषणावर प्रत्युत्तर दिले. तसेच, आगामी निवडणुकीत भाजपाला ३७० आणि एनडीएला ४०० पेक्षा जास्त जागा मिळणार, या मोदींनी केलेल्या दाव्यावरही प्रत्युत्तर दिले. 

मोदींच्या या दाव्यानंतर आता सर्वसामान्यांचा मत देण्याचा अधिकार राहिल की नाही, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. तर, शेवटी देशाच्या निवडणूक प्रक्रियेची खिल्ली उडवली जाईल, असेही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले.  

ओबीसी समाजावर यूपीए सरकारने अन्याय केला

काँग्रेस पक्ष आणि यूपीए सरकारने ओबीसींना न्याय दिला नाही. ओबीसी समाजावर अन्याय केला. काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला. त्यांचा आम्ही सन्मान केला. सन १९७० मध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या गेल्या. त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून स्वीकारण्यास नकार दिला. ज्या संविधानासाठी कर्पूरी ठाकूर यांनी जीवन व्यक्तीत केले, त्याग केला, त्यांचा अपमान काँग्रेसने केला, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसElectionनिवडणूक