शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

डॉक्टरांनी केलं होतं मृत जाहीर, अंत्यसंस्कारावेळी जाणवली हालचाल; रुग्णालयात नेत असताना ऑक्सिजन संपल्यामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 17:29 IST

मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारनातेवाईकांनी अंत्यसंस्कासाठी मृतदेह घरी नेला असता हालचाल होत असल्याचं जाणवलंरुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला असल्या कारणाने रस्त्यातच मृत्यू

भोपाळ - मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही. महिलेला योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात आले नाहीत, शिवाय कोणतीही वैद्यकीय चाचणी न करताच तिला मृत घोषित करण्यात आलं. नातेवाईकांनी अंत्यसंस्कासाठी मृतदेह घरी नेला असता हालचाल होत असल्याचं त्यांना जाणवलं. यानंतर त्यांनी तात्काळ सरकारी रुग्णवाहिकेतून महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्याची तयारी सुरु केली. पण महिलेचं दुर्देव इतकं होतं की, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला असल्या कारणाने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. जेव्हा महिलेला घेऊन नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांना छतरपूर जिल्हा रुग्णालयात जाऊन जोरदार हंगामा केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद अहिरवार याची पत्नी भागवती अहिरवारला प्रसूतीसाठी 5 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भागवती यांनी एका मुलीला जन्म दिला, मात्र त्यांची तब्बेत बिघडली. भागवती यांच्या सासूने दिलेल्या माहितीनुसार, 'तिच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. बेडवरुन खाली पडून ती ओरडत होती. जेव्हा रुग्णालयातील उपस्थित नर्स आणि इतरांना तिला उचलून बेडवर ठेवण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं. यामुळे तिची तब्बेत अजून बिघडली. यानंतर डॉक्टरांनी तिला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह घरी घेऊन जायला सांगितलं'.

भागवतीला मृत समजून नातेवाईक तिला घरी घेऊन आले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. यावेळी तिच्या शरिरात हालचाल होत असल्याचं काहीजणांच्या लक्षात आलं. भागवतीच्या सासूने सांगितल्यानुसार, तिने डोळेही उघडले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अरविंद घरी आला होता. तो येताच भागवतीने डोळे उघडले होते. यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली. भागवतीला घेऊन जेव्हा नातेवाईक छतरपूर जिल्हा रुग्णालयात चालले होते, तेव्हाच रस्त्यात रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला. यामुळे तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटल