शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

डॉक्टरांनी केलं होतं मृत जाहीर, अंत्यसंस्कारावेळी जाणवली हालचाल; रुग्णालयात नेत असताना ऑक्सिजन संपल्यामुळे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 17:29 IST

मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देमध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारनातेवाईकांनी अंत्यसंस्कासाठी मृतदेह घरी नेला असता हालचाल होत असल्याचं जाणवलंरुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला असल्या कारणाने रस्त्यातच मृत्यू

भोपाळ - मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जिवंत व्यक्तीला मृत घोषित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर महिलेची व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही. महिलेला योग्य ते वैद्यकीय उपचार देण्यात आले नाहीत, शिवाय कोणतीही वैद्यकीय चाचणी न करताच तिला मृत घोषित करण्यात आलं. नातेवाईकांनी अंत्यसंस्कासाठी मृतदेह घरी नेला असता हालचाल होत असल्याचं त्यांना जाणवलं. यानंतर त्यांनी तात्काळ सरकारी रुग्णवाहिकेतून महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्याची तयारी सुरु केली. पण महिलेचं दुर्देव इतकं होतं की, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला असल्या कारणाने रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. जेव्हा महिलेला घेऊन नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा तिला मृत घोषित करण्यात आलं. डॉक्टरांच्या दुर्लक्षपणामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांना छतरपूर जिल्हा रुग्णालयात जाऊन जोरदार हंगामा केला. 

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद अहिरवार याची पत्नी भागवती अहिरवारला प्रसूतीसाठी 5 जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जवळपास दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास भागवती यांनी एका मुलीला जन्म दिला, मात्र त्यांची तब्बेत बिघडली. भागवती यांच्या सासूने दिलेल्या माहितीनुसार, 'तिच्या पोटात प्रचंड वेदना होऊ लागल्या. बेडवरुन खाली पडून ती ओरडत होती. जेव्हा रुग्णालयातील उपस्थित नर्स आणि इतरांना तिला उचलून बेडवर ठेवण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केलं. यामुळे तिची तब्बेत अजून बिघडली. यानंतर डॉक्टरांनी तिला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह घरी घेऊन जायला सांगितलं'.

भागवतीला मृत समजून नातेवाईक तिला घरी घेऊन आले आणि अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. यावेळी तिच्या शरिरात हालचाल होत असल्याचं काहीजणांच्या लक्षात आलं. भागवतीच्या सासूने सांगितल्यानुसार, तिने डोळेही उघडले होते. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अरविंद घरी आला होता. तो येताच भागवतीने डोळे उघडले होते. यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका बोलावून घेतली. भागवतीला घेऊन जेव्हा नातेवाईक छतरपूर जिल्हा रुग्णालयात चालले होते, तेव्हाच रस्त्यात रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन संपला. यामुळे तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. रुग्णालयात पोहोचले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटल