शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, नवविवाहितेसमोरच सासू-ससऱ्यांसह पतीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 21:56 IST

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित चौहान आणि पूजा यांचे ३ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर, हे कुटुंब गरीबदास महाराजांच्या दर्शनासाठी राजस्थानला आले होते. यानंत नोएडाला परतत असताना कोल्वा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला मागून एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावरील दौसा जिल्ह्याच्या हद्दीत रविवारी भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. नोएडा येथील एक कुटुंब आपल्या मुलाच्या लग्नानंतर गरीबदास महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परतत असताना मागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. यामुळे कार उलटली आणि आई-वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला.

मृतांची ओळख पटली असून, ललित चौहान (३०), महिपाल चौहान (५५) आणि गीता देवी (५०) अशी मृतांची नावे आहेत. ललितची पत्नी पूजा देखील कारमध्ये होती. ती देखील गंभीर जखमी झाली आहे. तिला दौसा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित चौहान आणि पूजा यांचे ३ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर, हे कुटुंब गरीबदास महाराजांच्या दर्शनासाठी राजस्थानला आले होते. यानंत नोएडाला परतत असताना कोल्वा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला मागून एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, कार हवेत उडून उलटली, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले आणि तत्काळ रुग्णालयात दाखल केले. यानंतर, डॉक्टरांनी तपासल्यानंतर, ललित चौहान, महिपाल चौहान आणि गीता देवी यांना मृत घोषित केले. तर, पूजावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.

अपघातानंतर पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस