शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

गृह मंत्रालयाची ‘एनआरसी’साठी स्वतंत्र यंत्रणा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 07:07 IST

केंद्र, राज्य सरकारांत संघर्ष । केरळ, पश्चिम बंगालचा अंमलबजावणीस नकार

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) यांच्या अंमलबजावणीवरून केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारे यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्यांच्या अंमलबजावणी स्वत:च्या अखत्यारित नवी व्यवस्था निर्माण करण्याचा विचार केंद्र सरकारने चालविला आहे.

केरळ आणि पश्चिम बंगाल यांसारख्या काही बिगर-भाजपा शासित राज्यांनी सीएए आणि एनआरसी यांच्या अंमलबजावणीस नकार दिला आहे. बिहार, ओरिसा, आंध्रप्रदेश ही राज्येही अंमलबजावणी करण्यास नाखुष आहेत. सूत्रांनी सांगितले की, सीएए आणि एनआरसी मवाळ करण्याची केंद्राची कोणतीही योजना नाही. तसेच एनआरसीला कोणतीही कालमर्यादा नाही. झारखंडमधील एका प्रचार सभेत अमित शाह यांनी सांगितले आहे की, २0२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी एनआरसी संपूर्ण देशात लागू केले जाईल. केरळने तर नियमित ‘राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर’ची (एनपीआर) म्हणजेच जनगणनेची अंमलबजावणी करण्यासही नकार दिला आहे. नागरिकत्व कायदा १९५५ अन्वये दर दहा वर्षांनी राज्य सरकारांच्या मदतीने रजिस्ट्रार जनरल आॅफ इंडियाकडून दर १0 वर्षांनी (आरजीआय) एनपीआर प्रक्रिया राबविली जाते. एप्रिल २0२0 ते सप्टेंबर २0२0 या कालावधीत आसाम सोडून संपूर्ण देशात एनपीआर प्रक्रिया राबविण्यासाठी आरजीआयने जुलै २0१९ मध्येच अधिसूचना जारी केली आहे. २0२१ मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर (एनपीआर) जाहीर केले जाईल.सूत्रांनी सांगितले की, जी राज्ये ऐकणार नाहीत, तेथेच केंद्राकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. १५ राज्यांत भाजपाचीच सरकारे आहेत. बहुतांश केंद्रशासित प्रदेशही केंद्राच्या नियंत्रणात आहेत. या ठिकाणी केंद्र सरकार जनगणना आणि नागरिकत्व पडताळणी प्रक्रिया राबवू शकते.एनआरसीची अंमलबजावणी नागरिक नोंदणी अधिकाऱ्यांकडे?च्गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, सीएए आणि एनआरसीची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्याऐवजी विदेशी नागरिक विभागीय नोंदणी अधिकाºयांकडे (एफआरआरओ) सोपविली जाऊ शकते.च्सध्या देशात सुमारे डझनभर एफआरआरओ कार्यालये आहेत. ही कार्यालये संपूर्ण देशात निर्माण करून त्यांच्या मार्फत नागरिकत्व कागदपत्रांची पडताळणी करून घेण्याचा गृह मंत्रालयाचा विचार आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकHome Ministryगृह मंत्रालय