शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ईडीच्या टीमवर झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालय कठोर, ममता सरकारकडून मागितले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2024 10:00 PM

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील उत्तर २४ परगणा येथे छापेमारी दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयानेपश्चिम बंगाल राज्य सरकारकडून उत्तर मागितले आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने मंगळवारी (९ जानेवारी) ही माहिती दिली. या हल्ल्याप्रकरणी काय कारवाई करण्यात आली, याची माहिती राज्य सरकारने लवकरात लवकर द्यावी, असे गृह मंत्रालयाने म्हटले आहे.

या घटनेवरून राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी ५ जानेवारीची घटना जनक्षोभातून घडल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.पश्चिम बंगालचे कृषी मंत्री शोभनदेब चट्टोपाध्याय यांनी मंगळवारी दावा केला की तपास यंत्रणा छापे टाकणाऱ्या देशाच्या इतर भागातही असे हल्ले होतील. 

एका कार्यक्रमात शोभनदेब चट्टोपाध्याय म्हणाले, "राज्यात एका ठिकाणी जनक्षोभाचा स्फोट आम्ही पाहिला... भविष्यात भारतात इतर ठिकाणीही अशा घटना घडतील." मंत्र्यांच्या वक्तव्यावर भाजपा खासदार दिलीप घोष म्हणाले की, जनता पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारला वाचवायचे असेल तर सत्तेतून ताबडतोब हकालपट्टी करावी.

ईडी अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकरणगेल्या 5 जानेवारीला ईडीचे पथक राज्याच्या रेशन व्यवस्थेतील कथित अनियमिततेच्या संदर्भात संदेशखळी येथील तृणमूल काँग्रेसचे नेते शाहजहान शेख यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यासाठी आले होते, तेव्हा शेख यांच्या शेकडो समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ईडीचे तीन अधिकारी जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर, ईडीने सांगितले होते की, आमच्या तपासादरम्यान अनेक लोकांनी ईडी टीम आणि सीआरपीएफ जवानांवर एका कंपाउंडमध्ये त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. हे लोक काठ्या, दगड, विटा अशा शस्त्रांस्त्रे घेऊन तयार होते. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयwest bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय